Ajit Pawar In Kolhapur 
महाराष्ट्र

Ajit Pawar: विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर बोलू नये; तुम्ही दीड रुपया तरी दिला का? अजित पवार यांचा सवाल

Ajit Pawar In Kolhapur: कोल्हापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Bharat Jadhav

रणजीत माजगावकर , साम प्रतिनिधी

राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेवर विरोधकाकडून टीका केली जाते. विरोधकांच्या टीकेला अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलंय. विरोधकांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर बोलू नये. त्यांनी साधा दीड रुपया खर्चे केला नाही, असा टोला अजित पवार यांनी मारलाय. ते कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

कोल्हापूरच्या कार्यकर्ता मेळव्यात बोलतांना अजित पवार यांनी आपण भाजपसोबत का गेलो याचं उत्तर दिलं. पुन्हा एकदा सत्तेत जाण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगत त्यांनी जनतेला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांची लाच देऊन हे सरकार तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपण विकले जायचे की नाही, हे महिलांनी ठरवावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेत दिला होता.

तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या योजनेवरुन सरकारवर टीका केली होती. सरकार लाडकी बहीण योजने काढते पण राज्यातून लाखो महिला-मुली गायब आहेत. त्याचं काय? पोलीस भरतीची प्रक्रिया पावसाळ्यात पूर्ण केली जात आहे. मुलींना पावसात थांबावं लागत आहे. त्या लाडक्या बहिणी नाहीत का? सरकारने या योनजेच्या जाहीरातीसाठी २७० कोटी रुपये खर्च केलेत, असा टोला नाना पटोले यांनी मारला होता.

यासर्वांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तर दिलं. सरकारने लाडकी बहीण योजना फक्त निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून आलीय. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले, ही योजना पुढे सुरू हवी, असेल तर महायुतीचे सरकार पुन्हा आणावे लागेल. मी शब्दाचा पक्का आहे, आर्थिक शिस्त मी लावू शकतो.

कार्यकर्त्यांना अजित पवारांचा सल्ला

एकोप्याने कामं करा, हा काम करेल, तो कामं करा असे अजिबात चालणार नाही. नागरिकांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले, पुढे महापालिका, नगरपंचायत निवडणुकीत आहे, त्यावेळी कस लागणार आहे. खोट्या प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसवाल्यानी केवळ मते घेण्याचे कामं केले. आमचं सरकार २४ तास काम करत असतं.

आमचे मुख्यमंत्री पहाटे ४ वाजेपर्यंत काम करत असतात आणि मी पहाटे ५ वाजता उठून कामाला लागतो. याचा अर्थ आमचं सरकार २४ तास काम करणारं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा लागेल. आता सर्व निवडणुका लागणार आहेत, आपली खरी कसोटी आहे. या निवडणुकांमध्ये अनेकांना संधी द्यायची आहे, असं त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT