Buldhana Crime Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य

Buldhana Crime: बुलडाणामध्ये एका विहिरीत एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बापाने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:ही विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं.

Priya More
  • बुलडाण्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह विहिरीत आढळले

  • वडिलांनी ४ मुलांना विहिरीत ढकलून नंतर आत्महत्या केली

  • कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून घडली घटना

  • जळगाव जामोद पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये कौटुंबिक वादातून बापाचे टोकाचे पाऊल उचललं. बापाने चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राजुरा धरण परिसर हादरला. विहिरीमध्ये एकाच कुटुंपातील ५ जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पाचही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जळगाव जामोद पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका शेतातील विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार लहान मुलांना विहिरीत ढकलून नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव विजय मुसा किराडिया असे असून तो जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावात राहणारा होता. या व्यक्तीला ४ मुलं होती. प्रित किराडिया (वय ७ वर्षे)), प्राची किराडिया (वय ५ वर्षे), पूर्वी किराडिया (वय ४ वर्षे) आणि पियुष किराडिया (वय २ वर्षे) अशी त्याच्या ४ मुलांची नावं होती. विजय किराडिया आपल्या चार मुलांना सोबत घेऊन विहिरीवर गेला. आधी त्यावे चारही मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यानेही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय किराडिया याची पत्नी घरगुती वादातून माहेरी निघून गेली होती. रविवारी सकाळी विजय घरातील काम करत असताना त्याच्या वडिलांनी “तू स्वतः काम का करतो, तुझी बायको कुठे गेली?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर मानसिक तणाव आणि कौटुंबिक वादातून विजयने आपल्या चारही चिमुकल्यांना राजुरा धरण परिसरातील विहिरीत ढकलून स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या दुर्दैवी घटनेमुळे भाले अंजन गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

LPG e-KYC Deadline: 30 जूनपर्यंत हे काम उरकून घ्या, अन्यथा सिलेंडर आणि सबसिडीही मिळणार नाही

Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

Nashik Fort : मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतोय नाशिकचा 'हा' किल्ला, एकदा नक्कीच भेट द्या

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्याचा फटका; छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT