Shravan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan 2024 : श्रावणातील उपवासाला 'हा' फलाहार करा, थकवा अन् ॲसिडीटी होईल दूर

Shreya Maskar

श्रावण महिना सुरू झाला असून सर्व महिला वर्ग श्रावणी सोमवारची तयारी करताना आपल्याला सर्वत्र दिसत आहे. श्रावण महिना म्हणजे सणासुदीचा सोहळा. सण म्हटलं की, उपवास आला. श्रावणी सोमवारात उपवासाच्या दिवशी 'या' पाच फळांचे सेवन केल्यास अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळेल. तसेच ही पाच फळे उपवासासाठी पवित्र मानली जातात. उपवासाला फळांचे सेवन हा आरोग्याच्या दृष्टीने रामबाण उपाय आहे.

उपवासादरम्यान आहारातील फायबर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. म्हणून उपवासात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. तसेच श्रावणातील उपवास पावसाळ्यात येत असल्यामुळे आपली पचनक्रिया आधीच मंदावलेली असते. अशात उपवासात जर तेलकट पदार्थ खाल्ल्यास अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. थकवा जाणवतो. उपवासाच्या या सर्व समस्यांपासून सुटण्यासाठी फळांचे सेवन करावे.

डाळिंब

डाळिंब हे अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळ आहे. डाळिंब पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. उपवासाला डाळिंब खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच डाळिंबाचा ज्यूस हा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. डाळिंबामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होते.

सफरचंद

उपवास असो किंवा नसो सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच देतात. सफरचंदामुळे शरीरासोबत त्वचाही निरोगी राहते. उपवासाच्या दिवशी सफरचंद खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तसेच अपचनाच्या समस्या ही उद्भवत नाही. सफरचंदामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटासंबंधित होणारे विकार दूर करतो.

केळी

केळी हा फायबर चा उत्तम स्त्रोत आहे. पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते त्यामुळे केळी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. तसेच पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. उपवासात पोटाला थंडावा मिळतो. केळ व्हिटॅमिन्सचा खजिना आहे. उपवासाला केळी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

आंबा

श्रावणाचा उपवास हा पावसात येत असल्यामुळे बाजारात काही प्रमाणात आंबा उपलब्ध असतात. उपवासाला आंबा आणि आंब्याचा रस तुम्ही पिऊ शकता. आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट, पोटॅशियम, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. आंबा खाल्ल्यामुळे उपवासात अपचनाच्या समस्या उद्भवत नाही.

पपई

पपई हे गरम फळ असल्यामुळे अनेक लोक खायला टाळतात. पण उपवासात पपई खाल्ल्यामुळे ॲसिडीटी, पोटदुखी, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवत नाही. पपई गरम फळ असल्यामुळे पावसाळ्यात पोटाला ऊब मिळते. पपई मधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संसर्ग होण्यापासून आपले संरक्षण करतात.

उपवासात फळे खाताना 'ही' काळजी घ्यावी

  • सकाळच्या नाश्त्याला फळे खावी.

  • एकावेळी एकाच फळाचे सेवन करावे.

  • फळे कापून त्वरित खावी दीर्घकाळ ठेवू नये.

  • फ्रीजमधून काढलेली फळे सामान्य तापमानात आल्यावर खावी.

  • उपवासात फळे खाताना फळांवर कोणतेही मसाले टाकू नये. त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवू शकते.

  • उपवासात भरपूर पाणी आणि फळांचे रस प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT