प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक (Investment) करतात. तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ११५ महिन्यात पैसे डबल मिळणार आहेत. किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो.जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत इन्व्हेस्टमेंट का.
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) योजनेत कोणत्याही रिस्कशिवाय रिटर्न मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर ११५ महिन्यात पैसे डबल करुन मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी १००० रुपये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करु शकतात.
पोस्ट ऑफिसच्या योजनेत तिमाही आधारावर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत १० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांच्या नावाने अकाउंट उघडू शकतात.
किसान विकास पत्र या योजनेत पैसे डबल होतात. या योजनेत तुम्ही जर ५ लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरटी म्हणजेच ११५ महिन्यानंतर ७.५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्हाला १० लाख रुपये मिळतात. या योजनेत आधी १२३ महिन्याचा मॅच्युरिटी ११५ महिने झाला आहे.
लहान मुलांच्या भविष्यासाठी खूप आधीपासून गुंतवणूक करावी लागते. तुम्ही जर किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला डबल परतावा मिळणार आहे. तुम्हाला ११५ महिन्यानंतर डबल पैसे मिळणार आहे. म्हणजे तुमचे १० लाखाचे २० लाख होणार आहेत तर २० लाखाचे ४० लाख होणार आहे. या योजनेत किती गुंतवणूक करायची हे तुमच्यावर अवलंबून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.