विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विमानातून प्रवास करताना काही नियमांचे पालन करायचे असते. एअरपोर्टचेदेखील काही नियम असतात. त्यामुळे या नियमांचे पालन केले तरच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. नुकताच विमानात घेऊन जाण्याच्या बॅग, लगेच याबाबतच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
विमानातून प्रवास करताना कोणतं सामानं न्यावं, कोणतं नाही याबाबतच्या नियमांची माहिती दिली आहे. सुरक्षेच्या कारणात्सव बॅगेजमधून घरगुती सामान नेण्यास मनाई आहे. याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आठ श्रेणींमध्ये हे वर्गीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये शस्त्री आणि प्रतिकृती, विस्फोटक, खतरनाक पदार्थ, उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आयटम, घरगुती गोष्टी आणि खेळाचं साहित्य नेण्यास बंदी करण्यात आली आहे. प्रवाशांना या नियमांचे पालन करावा लागणार आहे. तुम्हाला या गोष्टी विमानातून नेता येणार नाही, असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विमानातून प्रवास करताना तुम्हाला चाकू, मोबाईलची बॅटरीसारखी धारदार वस्तू, लायटर या वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कात्री, रस्सी,मेजरिंग किंवा मास्किंग टेप, नाइट स्टिक, रेजर टाइप ब्लेड, छत्री, विणकामाच्या सूया, पंपासह एअर गादी, मिरचीचे लोणचे, माचिस, स्क्रू, नारळ, बर्फ फोडण्याचे हत्यार नेयू नये.
नारळ नेण्यास मनाई
विमानतळावर लिव्विड सामान घेऊन जाण्यावर नियम बनवण्यात आले आहे. नारळ तुम्हाला नेता येणार नाही. नारळ हा ज्वलनशील असतो. त्यात सर्वाधिक तेल असतं. सुरक्षेच्या कारणात्सव नारळ घेऊन जाण्याची परवानगी नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.