चेतन व्यास
वर्धा : निसर्गाच्या आणि यंत्रणेच्या दृष्टचक्रात जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. विशेष म्हणजे यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) आत्महत्यांच्या आकड्यांत दरवर्षी वाढच होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मागील अकरा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल १३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळल्याची माहिती आहे. (Maharashtra News)
वर्धा (Wardha) जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, हमीभावाची खरेदी वेळेवर नाही आणि चुकारे लवकर नाहीत. पाणी असेल तर शेतीपंपाची वीज कापणी, नुकसानीची भरपाई वेळेवर नाही. विम्याबाबत (Crop Insurance) कचखाऊ भूमिका, अशा निसर्गाच्या आणि यंत्रणेच्या दृष्टचक्रात जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. विशेष म्हणजे यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यांत दरवर्षी वाढच होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
४३ प्रकरणे अपात्र
यंदा जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंतच्या काळात तब्बल १३८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात १३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास घेतला. यात ४३ प्रकरणे पात्र ठरली. तर ४३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तसेच ५२ प्रकरणं चौकशीत प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे.
४० जणांच्या वारसांनाच मदत
शेतकरी आत्महत्यांचा आकडा १३८ झाला असला तरी मदत केवळ ४० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांनाच ४१ लाख रुपयांची शासनाकडून मदत मिळाली आहे. त्यामुळे मदतीचे नेमके निकष काय, आणि मदत कशी दिली जाते, याचा देखील गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.