छत्रपत्री शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवर नमो केंद्र उभारण्यात येत आहेत. ही नमो केंद्र फोडून काढू असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएममधील गडबडीवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी नमो केंद्रावरून सरकारला इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर टुरिस्ट स्पॉट नेमत आहे. तेथे नमो केंद्र उभारली जात आहेत. ही नमो केंद्र शिवनेरी, रायगड, प्रतापगड यांसारख्या किल्ल्यांवर ही केंद्र उभारणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. , जिथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असले पाहिजे, तिथे इतर कुणाचीही नावे नकोत. जर तेथे नमो केंद्र उभारली तर ती फोडून असा आक्रमक पवित्रा राज ठकारेंनी घेतलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.