पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचे रक्त हे खवळले होते. याचाच बदला घेत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करत शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यानंतर आज अचानक पीएम मोदी हे आदमपूर एअरबेस येथे पोहोचले आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन करत संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत माता की जयचा नारा देत म्हणाले, या भारत माता की जयची ताकद संपूर्ण जगाने बघितली. पुढे ते म्हणाले, ही फक्त घोषणा नाहीये तर त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो स्वतःची देशासाठी आहुति देतो. त्या प्रत्येक नगरिकाचा आवाज आहे जो या देशासाठी काहीतरी करू इच्छितो आणि देशासाठी आपले प्राण देखील देऊ शकतो. ही घोषणा खेळाच्या मैदानात देखील गुंजते आणि युद्धांमध्ये देखील या घोषणेचा आवाज येत असतो,असे मोदी म्हणाले, याप्रसंगी आदमपूर एअरबेस हा भारत माता की जयच्या घोषणेने दुमदुमून गेल्याचे पहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.