पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आपापल्या राज्यांतून पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार, राज्यातल्या 48 शहरांत एकूण 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून, ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.