india Pakistan Air Space Ban : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानला बुधवारी रात्री जबरी दणका दिलाय. पाकिस्तानी विमानासाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मे पर्यंत भारताने आपले हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.
भारताने पाकिस्तान-नोंदणीकृत, संचालित किंवा भाडेतत्त्वावरील विमान, विमान कंपन्या आणि लष्करी उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) बुधवारी याबाबत नोटीस टू एअरमेन (NOTAM) जारी केली. ही बंदी ३० एप्रिल ते २३ मे २०२५ पर्यंत लागू राहील. पाकिस्तानने सहा दिवसांपूर्वी भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले. पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यामुळे पाकिस्तानी विमानांना आता चीन किंवा श्रीलंका मार्गे लांबचा मार्ग घ्यावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.