IND vs BAN:  अडीच दिवस अन् 52 षटकात जिंकली मॅच! काय होता रोहितचा 'मास्टरप्लान'?
rohit sharmatwitter

IND vs BAN: अडीच दिवस अन् 52 षटकात जिंकली मॅच! काय होता रोहितचा 'मास्टरप्लान'?

Rohit Sharma Masterplan In IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ५२ षटकात सामना जिंकला. दरम्यान काय होता रोहित शर्माचा मास्टरप्लान? जाणून घ्या.
Published on

Rohit Sharma Statement: भारतीय संघाने कानपूरच्या मैदानावर अवघ्य अडीच दिवसात कसोटी विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातील अडीच दिवस पावसामुळे धुतले गेले. हा सामना ड्रॉ च्या दिशेने जात होता. मात्र भारतीय संघाने कसोटीत टी-२० स्टाईल फलंदाजी करत विजय खेचून आणला. दरम्यान बांगलादेशला हरवण्यासाठी काय होता, भारतीय संघाचा प्लान? जाणून घ्या.

या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. सामन्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या ३५ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि पुढील ३ दिवस एकही चेंडू टाकला गेला नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस नव्हता, मात्र मैदान ओलं असल्यामुळे सामन्याला सुरुवात होऊ शकली नव्हती. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी पाऊस थांबला आणि भारतीय संघाने आक्रमक क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

IND vs BAN:  अडीच दिवस अन् 52 षटकात जिंकली मॅच! काय होता रोहितचा 'मास्टरप्लान'?
IND vs BAN 2nd Test: कसोटीत टी-२० स्टाईल बॅटिंग! टीम इंडियाने मोडले हे मोठे रेकॉर्ड्स

काय होता भारतीय संघाचा प्लान?

कानपूर कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने हा सामना जिंकण्यासाठी काय प्लान होता, याबाबत खुलासा केला आहे. बांगलादेशने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ३ गडी बाद १०७ धावांपर्यंत मजल मारली होती. दरम्यान आपल्या प्लानबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की,' ज्यावेळी आम्ही चौथ्या दिवशी गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलो त्यावेळी कुठल्याही परिस्थितीत ऑल आऊट करायचं होतं. आम्हाला हे पाहायचं होतं की, आम्ही फलंदाजीत काय करु शकतो. आम्ही किती वेळ फलंदाजी करतो हे नाही, तर किती वेळ गोलंदाजी करु शकतो, हे महत्वाचं होतं.'

IND vs BAN:  अडीच दिवस अन् 52 षटकात जिंकली मॅच! काय होता रोहितचा 'मास्टरप्लान'?
IND vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर टीम इंडियासाठी कसं असेल WTC फायनलचं समीकरण?

'या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. मात्र तरीही दमदार गोलंदाजी करुन विजय मिळवणं हे खरंच शानदार आहे. आमच्या गोलंदाजांनी खरंच चांगला खेळ करुन दाखवला आहे. फलंदाजही आक्रमण करायला तयार होते. त्यामुळे आम्ही सामना जिंकण्याची संधी निर्माण केली.' असं रोहित शर्मा म्हणाला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर बांगलादेशने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३३ धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ९ गडी बाद २८५ धावा करत डाव घोषित केला. दरम्यान दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव अवघ्या १४६ धावांवर आटोपला. दरम्यान भारताला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ९५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com