IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर!

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
IND vs AUS Test Series
IND vs AUS Test SeriesSaam TV

IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे. पाठीचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Latest Marathi News)

IND vs AUS Test Series
Ind Vs NZ T20 Series: करो या मरो मुकाबल्यासाठी हार्दिकची मोठी चाल, Toss जिंकला; अशी आहे प्लेईंग 11

भारत  (Team India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून या मालिकेचा पहिला सामना ९ फेब्रुवारीला नागपुरात रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे श्रेयस पहिला कसोटी सामना खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

याच दुखापतीमुळे श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला होता. सध्या त्याला 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशातच त्याच्या जागी टी-20 मध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला पदार्पण करण्याची संधी दिली जाणार आहे.

नुकतीच भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या सिरीजसाठी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.  टीम इंडियाकडून (Team India) सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सूर्याची कामगिरी बघता निवड समितीने त्यावर विश्वास दाखवला आहे.

IND vs AUS Test Series
IND vs NZ T20 : तिसऱ्या टी-२० सामन्याआधी हार्दिकने डाव टाकला; टीम इंडियात होणार दोन मोठे बदल

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, श्रेयस अय्यरची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. त्यामुळे त्याला २ आठवड्यांच्या आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो मैदानात कधी कमबॅक करणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाला २००४-०५ नंतर भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. २००५ नंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळपट्टींवर सलग तीन कसोटी मालिका गमावल्या आहेत आणि यंदा ही मालिका खंडित करण्याचा त्यांचा निर्धार आहे. भारतात होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी फिरकीपटूंना साथ देणारी खेळपट्टी असेल, याची जाण ऑस्ट्रेलियाला आहे. त्यामुळेच त्यांनीही संघात फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com