
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आलंय..तर दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशाराच पंतप्रधान मोदींनी दिलाय...एवढंच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक झालीय.. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यासाठीची रणनीती आखलीय.
दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प
सशस्त्र दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त
प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य, वेळ ठरवण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय.
त्यातच सीसीएसच्या बैठकीपुर्वी पाकड्यांविरोधात मिशन बदला सुरु करण्यापुर्वी भारताने काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतलाय...तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, संरक्षणमंत्री, पररराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत सीसीएसची बैठक झाली.. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय घेत सैन्यदलातील विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र याचा अर्थ नेमका काय? पाहूयात.
दहशतवाद्यांच्या आडून पाकड्यांनी आतापर्यंत निष्पाप भारतीयांचा जीव घेतला. हा पाकड्यांचा माज उतरवण्यासाठी भारतीय सेना सज्ज झालीय. एवढंच नाही तर सरकारने सैन्याला खुली सूट दिल्याने युद्धासोबत पाकड्यांचा विनाश अटळ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.