
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानच्या दूतावासाला बंद करण्याचा, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा, सिंधू जल करार संपवण्याचा आणि अटारी चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर प्रश्न उभे राहिले आहेत. सीमा हैदरच्या भविष्यावर शंका निर्माण झाली असून, तिच्या देशाबाहेर पाठवण्यासह, तिच्या न्यायालयीन खटल्यांचा विचार करून सवलत मिळेल का, याबद्दल चिंतित चर्चा सुरू आहे.
22 एप्रिल 2025 रोजी पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला. सरकारने तातडीने कारवाई करत पाकिस्तानी दूतावास बंद केला आणि सर्व पाक नागरिकांचे व्हिसा रद्द केले. त्याचवेळी, पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला, हा निर्णय दहशतवादी हल्ल्याच्या कठोर प्रतिसाद म्हणून घेतला.
सीमा हैदरने मे 2023 मध्ये नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता, आणि सध्या तिचा विषय चर्चेचा आहे. ती ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा येथील सचिन मीणा याच्यासोबत लग्न करून हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा करते. अलीकडेच तिने एक मुलीला जन्म दिला, ज्यामुळे तिचा प्रकरण अधिक जटिल बनला आहे. सीमा हैदर कडे भारतीय नागरिकता नाही आणि तिच्या प्रकरणाची चौकशी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ATS कडे आहे.
सीमा हैदरच्या भारतात अवैधरित्या प्रवेशाचा मुद्दा नोएडा न्यायालयात प्रलंबित आहे. 4 जुलै 2023 रोजी सीमा आणि तिच्या पती सचिन मीणाला पोलिसांनी अटक केली होती, परंतु नंतर जामिनावर त्यांची सुटका झाली. सीमा भारतातच राहण्याची इच्छा व्यक्त करते आहे. तिच्या वकिलांनी तिची मागणी मान्य होण्यासाठी कोर्टात प्रयत्न सुरू केले आहेत. याउलट, सीमा हैदरच्या पाकिस्तानी पती गुलाम हैदरने मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.