
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात डिजीटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या अधिकृत सोशल मीडिया X (ट्विटर) अकाउंटवर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे अकाऊंट आता भारतात अॅक्सेस करता येणार नाही आहे.
सीसीएस बैठकीत घेण्यात आले काही निर्णय
मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानविरोधात ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये,
-अटारी सीमा बंद.
-सिंधू पाणी करार थांबवला.
-डिजिटल स्ट्राइक - पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंट बंद.
-अंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानविरोधात मोहिम.
-पाकिस्तानी नागरिकांना भारतात व्हिसाद्वारे प्रवास करण्याची बंदी.
-पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी.
पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण
भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी नेमकं काय घडलं?
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करून अनेक निष्पाप भारतीयांचा जीव घेतला. २२ एप्रिलला अचानक दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात २८ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर भारताने देखील पाकिस्तानविरोधात ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.