
पहलगामवर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वॉटरस्ट्राईक करत पाकड्यांच्या नाकात दम आणलाय.. त्यामुळे भयभीत झालेल्या पाकड्यांनी थयथयाट करायला सुरुवात केलीय..आता पाण्याच्या थेंबाथेंबासाठी वणवण करावी लागणार असल्यानेच बिलावल भुट्टोने थेट सिंधू नदीतून भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहण्याची पोकळ धमकी दिलीय..
सिंधू नदीचं पाणी पाकड्यांच्या अर्थव्यवस्थेचा श्वास आहे.. त्यामुळे सिंधू नदीचं पाणी तोडल्याने पाकड्यांची कशी कोंडी होणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
सिंधू करार रद्द, पाकिस्तानची कोंडी
पिण्याचं पाणी
सिंध आणि पंजाब प्रांतांत पाण्याची भीषण टंचाई होईल
शेती क्षेत्र
पाकिस्तानमधील 80 टक्के शेती सिंधू, झेलम, चिनाब नदीच्या पाण्यावर आधारित
ऊर्जानिर्मितीत घट
सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात
आर्थिक झळ
पाकिस्तानातील महत्त्वाचे उद्योगधंदे सिंधूच्या पाण्यावर अवलंबून
याआधीही दहशतवादी हाफीज सईदने सिंधू नदीचं पाणी रोखण्यावरुन कोल्हेकुई केली होती.
दहशतवाद्यांना पोसणाऱ्या आणि भारतीयांच्या नरसंहाराला जबाबदार असलेल्या पाकड्यांचं तोंड काही बंद होत नाही.. त्यामुळे फक्त सिंधू नदीचं पाणी बंद करुनच नाही तर पाकड्यांचा माज धुळीस मिळवून पहलगाम हल्ल्यातील भारतीयांच्या नरसंहाराचा बदला घेण्याची गरज आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.