Coromandel Train Accident : काहीतरी नक्कीच....; ओडिशा रेल्वे अपघाताच्या घटनेवर ममता बॅनर्जींना वेगळाच संशय

Balasore Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चाही केली
Balasore Train Accident
Balasore Train Accidentsaam tv

Balasore Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातस्थळी भेट दिली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चाही केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर संशय व्यक्त करून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. (Latest Marathi News)

ओडिशा येथील बालासोरमध्ये रेल्वे अपघात झाला. आधी दुरांतो एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक झाली. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस येऊन धडकली. या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातस्थळी भेट देऊन आढावा घेतला.

Balasore Train Accident
Odisha Train Accident Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाला रवाना, घटनास्थळी जाऊन परिस्थिताचा आढावा घेणार

यावेळी ममता यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. रेल्वे प्रशासन आणि ओडिशा सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले. या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करतानाच समन्वयाच्या अभावाचा मुद्दा उपस्थित करत रेल्वे प्रशासनावर निशाणा साधला. या दुर्घटनेत बंगालमधील मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतही जाहीर केली.

Balasore Train Accident
Coromandel Express Accident: तेच ठिकाण, तीच कोरोमंडल ट्रेन आणि तोच शुक्रवार; 14 वर्षांपूर्वीच्या जखमा भळभळल्या

'काहीतरी नक्कीच झालंय'

ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेनंतर शंका व्यक्त केली. नक्कीच काहीतरी झालंय. सखोल चौकशी व्हायला हवी, असा संशय ममतांनी व्यक्त केला. रेल्वे प्रशासनावरही त्यांनी निशाणा साधला. समन्वयाचा अभाव असल्याचं त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'यापूर्वी रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये दिले जात होते. आता १० लाख रुपये दिले जातात.' राज्य सरकार पश्चिम बंगालमधील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देणार आहे. राज्य सरकारच्या वतीने आज १७ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. काल ४० रुग्णवाहिका पाठवल्या होत्या. तसेच ४० डॉक्टर तिथे सेवेत आहेत, अशी माहितीही ममता यांनी दिली.

मृतांचा आकडा ५०० वर जाण्याची भीती

ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर शंका व्यक्त करतानाच रेल्वे प्रशासनावर निशाणा साधला. या घटनेमागे नक्कीच काहीतरी आहे. याची चौकशी व्हायला हवी. या घटनेतील मृतांची संख्या ५०० वर जाण्याची भीती आहे, असंही त्या म्हणाल्या. पश्चिम बंगाल सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. काही जखमी आहेत, येथे योग्य उपचार न मिळाल्यास बंगालमध्ये त्यांच्यावर उपचार केले जातील. राज्य सरकार सगळी मदत करेल. १९८१ नंतरचा हा सर्वात मोठा अपघात आहे, असंही ममता म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com