Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! सातही धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर, वाचा ताजी आकडेवारी

Mumbai Rain And Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्के इतका झाला आहे. कोणत्या जलाशयामध्ये किती पाणीसाठी याची आकडेवारी वाचा...
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा नवी आकडेवारी
Mumbai Dam Water LevelSaam TV
Published On

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसात जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल. ७ जलाशयांपैकी ४ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्के इतका झाला आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०२,६१९ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,५७,९१९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा नवी आकडेवारी
Mumbai Water Storage: दिलासादायक! मुंबईला पाणी पुरवठा करणारी चार धरणं ओव्हरफ्लो, पाहा VIDEO

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा नवी आकडेवारी
Mumbai News: भयंकर! सोसायटी मिटिंगमध्ये तुफान राडा, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ७५.७६ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.३० टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९५.४१ टक्के पाणीसाठा

- भातसा - ८८.८७ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा नवी आकडेवारी
Mumbai News: लोकसभेतील नरेटीव्ह खोडण्याचा भाजपचा प्रयत्न! सर्व ITI कॉलेजमध्ये उभारणार 'संविधानाचे मंदिर'; मंगल प्रभात लोढांची घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com