Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, वाचा आजची आकडेवारी

Water Storage Increases In Mumbai Dam: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ३ जलाशये १०० टक्के भरली तर चौथे जलाशय देखील काठोकाठ भरले आहेत. तुलसी, विहार, मोडक सागरनंतर आता तानसा धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे.
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, वाचा आजची आकडेवारी
Water Storage Increases In Mumbai DamSaam Tv
Published On

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मुंबईत असलेली १० टक्के पाणीकपात २९ जुलैपासून रद्द करण्यात आली. मुंबई महानगर पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ३ जलाशये १०० टक्के भरली तर चौथे जलाशय देखील काठोकाठ भरले आहेत. तुलसी, विहार, मोडक सागरनंतर आता तानसा धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सातही जलाशयांमध्ये ७५.०६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, वाचा आजची आकडेवारी
Mumbai Local Train : तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचा खोळंबा; जलद मार्गावरील लोकल तब्बल २० मिनिटे उशिराने

मुंबई महानगर पालिकेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ७५.०६ टक्के इतका झाला आहे. ३० जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०,८६,३७६ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ७५.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १०,७०,८४२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ७३.९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणजेच मागच्यावर्षीच्या तुलनेत या धरणातील पाणीसाठा जास्त आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, तानसा हे जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, वाचा आजची आकडेवारी
Mumbai Water Cut : मुंबईकरांना मोठा दिलासा, आजपासून १० टक्के पाणीकपात रद्द; धरणांमध्ये जमा झाला इतका पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ४६.२२ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.३८ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ७७.४२ टक्के पाणीसाठा

- भातसा - ७२.९० टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं टेन्शन मिटलं, पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, वाचा आजची आकडेवारी
Mumbai News : पत्नी बाहेर जाताच पतीची नियत फिरली, मेहुणीच्या २० वर्षीय मुलीवर बलात्कार; मुंबईतील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com