
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकी कधी नव्हे ते महत्त्व आलयं.. त्याला कारण ठरलयं ठाकरे बंधूंची युती...गेली 9 वर्षं या पतपेढीवर उध्दव ठाकरेंच्या गटाचं वर्चस्व आहे.. मात्र यावेळी या निवडणुकीत ठाकरे बंधूचं उत्कर्ष पॅनल आणि महायुतीचं सहकार समृद्धी पॅनेल अशी थेट लढत झालीय. त्यातच निवडणुकीच्या एक दिवस आधीच ठाकरेंच्या उमेदवारांची EOW कडून चौकशी सुरु झाली आणि वादाची ठिणगी पडली. त्यात निवडणुकीत मतदारांना पैशांचं आमिष दाखवल्याच्या आरोपावरून मनने आणि भाजप आमनेसामने आलेत.
चार वर्षांपासून बेस्ट पतपेढीची निवडणुक रखडली होती. बेस्ट पतपेढी निवडणुकीत 15 हजार मतदारांनी मतदान केल असून निवडणुकी पाच पॅनेल रिंगणात आहेत. बेस्ट निवडणुकीत नितेश राणें आणि शिंदेसेनेचे किरण पावसकर यांच्या संघटनांनी प्रसाद लाड यांच्या समृध्दी पॅनेलला पाठिंबा दिला असल्यानं या निवडणुकीतली चुरस आणखी वाढली आहे.
दुसरीकडे युतीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी एकत्रित निवडणुक लढवण्याचा निर्णय दोन्ही ठाकरे बंधूनी घेतलेला असला तरी एक प्रकारे ही निवडणूक म्हणजे ठाकरे बंधूंची लिटमस टेस्ट असणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.