Devendra Fadnavis News: कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार; फडणवीस छातीठोकपणे म्हणाले, 'गरीबांसाठी दिल्लीतून...'

Devendra Fadnavis on Karnataka Election: कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Devendra Fadnavis on Karnataka Election
Devendra Fadnavis on Karnataka ElectionSaam TV

Devendra Fadnavis on Karnataka Election: कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आपलंच सरकार स्थापन व्हावं, यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशातच बेळगावात आणि कर्नाटकातही कमळच फुललेले दिसेल. गेल्या 9 वर्षांत देशात मोठे परिवर्तन झाले आहे, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते कर्नाटकातील सभेत बोलत होते. (Breaking Marathi News)

Devendra Fadnavis on Karnataka Election
Sharad Pawar Latest News: मोठी बातमी! पुढील २ दिवसात अंतिम निर्णय घेऊ, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

गरीबांसाठी दिल्लीतून येणारा प्रत्येक पैसा पूर्णपणे गरीबांच्या खात्यात जात आहे. दलाली आणि मध्यस्थांची संपूर्ण यंत्रणा संपविण्याचे काम मोदीजींनी केले. भारताला जगातील पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविण्याचे काम मोदीजींनी केले. मूठभर लोकांच्या तिजोरीत असलेला पैसा देशाच्या तिजोरीत आल्याबरोबर देशात झालेले परिवर्तन तुम्ही अनुभवत आहात, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

'भाजप मराठी भाषिकांच्या पाठीशी'

भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगाव येथे प्रचाराला आलो होतो. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कर्नाटकात प्रभारी होते. तेही सर्वत्र फिरले आहेत. मी स्वत: मराठी भाषिकांच्या मागे उभा आहे आणि आमचा पक्ष सुद्धा ठामपणे उभा आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

'राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते'

संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती. संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. त्यांनी आपल्या मित्रपक्षाला प्रचार कुठे करा आणि कुठे करु नका, याबाबत सांगितले नाही. कारण, ते येथे काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis on Karnataka Election
PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानच्या १४ व्या हप्त्याची तारीख ठरली

'मोदींनी कलम ३७० रद्द करून देशाला सुरक्षित केलं'

बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असा घणाघातही देवेंद्र फडणवीसांनी केला. जागतिक पातळीवर सुद्धा भारताची ताकद निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. 370 कलम रद्द करुन देशाला सुरक्षित करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले, असंही फडणवीस म्हणाले.

'कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार नाही'

विरोधी पक्षांनी फक्त एकच काम केले, ते म्हणजे त्यांच्या सरकारांनी मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार नाही, तरीही काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. बजरंग दलावर बंदी टाकायची कुणाच्या बापाची हिंमत नाही. डोक्याला गंध लागले तर ते पुसायचा अट्टाहास काँग्रेसच्या अध्यक्षांकडून केला जातो.

काँग्रेसच्या सत्तेच्या मनसुब्यांना आग लावण्याचे काम मतांच्या रूपाने तुम्हाला करावे लागेल. रामाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍यांना त्यांची जागा दाखविण्याची ही वेळ आहे. आमची संस्कृती, भारतमाता, प्रभू श्रीराम ही आमची अस्मिता आहे. त्यावर कुणी प्रश्नचिन्ह निर्माण करीत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com