Maharashtra Band : बदलापुरातील घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक; येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

Maha Vikas Aghadi Maharashtra Band : राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
Maha Vikas Aghadi Maharashtra Band
Maha Vikas Aghadi Maharashtra BandSaam TV
Published On

मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादवून टाकलं आहे. अत्याचाराच्या या घटनेविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील माध्यमांना माहिती दिली.

Maha Vikas Aghadi Maharashtra Band
Badlapur Crime : बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र कुणीही घेऊ नका; वकील संघटनेतर्फे आवाहन

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांची उपस्थिती होती.

या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "आजच्या बैठकीत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. कारण, महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे. त्यामुळे आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या घटना रोखाव्यात", असं संजय राऊत म्हणाले.

येत्या 24 तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, बदलापूर येथील घटनेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शिवसेना ईशान्य मुंबईच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी हाती दोर घेऊन महिलांनी आरोपीला फाशी देण्याच्या मागणी केली. त्याचबरोबर महायुती सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बदलापूर येथे चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आलेली शाळा ही शाळा भाजपची नेत्याची असल्याने पोलिसांनी मुद्दामहून कारवाईला दिरंगाई केली, असा आरोपही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटरून पोस्ट करत महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं. "लाडक्या बहिणीं'च्या लेकीने किती छळ सोसायचा? बदलापूर पाठोपाठ अकोल्यातील काजीखेड गावात एका शिक्षकावर ६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात? सरकारने 'फडतूस'गिरी बंद करा, राजीनामा द्या", अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

Maha Vikas Aghadi Maharashtra Band
Badlapur News : बदलापुरातील तब्बल 300 आंदोलकांवर गुन्हे, आतापर्यंत 28 जणांना अटक; परिसरात तणावपूर्ण शांतता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com