
आषाढी वारी करून पंढरपूरवरून घराकडे परतणाऱ्या वारकऱ्यांच्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ३० वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीनिमित्त विठूरायाचे दर्शन घेऊन घराकडे परत निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला बुलडाण्यात भीषण अपघात झाला. पंढरपूर- खामगाव या एसटी बसला चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर अपघात झाला. एसटी बस दुभाजकावर आढळून रस्त्यावर उलटली. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये ३० प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ मदत करत वारकऱ्यांना उपचारासाठी दाखल केलं. जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी चिखली आणि बुलडाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या एसटी बसमधून ५१ वारकरी प्रवास करत होते. ही एसटी बस पंढरपूरवरून खामगावच्या दिशेने जात होती. पंढरपूरमधील सोहळा आटोपून वारकरी आपल्या घरी जात असताना ही अपघाताची घटना घडली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.