Sharad Pawar On Annabhau Sathe: एखाद्या विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यायला हरकत नाही; शरद पवारांनी व्यक्त केली इच्छा

Sharad Pawar On Annabhau Sathe: 'एखाद्या विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी केली तर ते वावग ठरणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले.
Sharad Pawar On Annabhau Sathe
Sharad Pawar On Annabhau SatheSaam tv
Published On

सचिन जाधव

Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. साताऱ्याच्या दौऱ्यादरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या आयोजित मातंग परिषदेला हजेरी लावली. या परिषदेदरम्यान, शरद पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर मोठं वक्तव्य केलं. 'एखाद्या विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी केली तर ते वावग ठरणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या आयोजित मातंग परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, 'मातंग समाजात शिक्षणाची कमतरता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती कमी आहे. मातंग तरुणांना अजून पुढे घेऊन जावं लागेल. ओबीसीमध्ये अनेक समाज आहे. जातीच्या आरक्षणामध्ये मर्यादित जागा असतात. अनेक जागाबाबत अबकड असे भाग केले. ज्या समाजात घटक मागे राहिला आहे, त्यांना संधी मिळायला हवी'.

Sharad Pawar On Annabhau Sathe
Maharashtra Politics: काँग्रेसची मागणी रास्त... विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य

'१०० डॉक्टर असले तरी कमीत कमी २०-२२ डॉक्टर धनगर समाजाचे आहेत,आनंद आहे पण बाकीचा समाज पण मागे राहता कामा नये. मातंग समाज अजून मागे आहे. मातंग समाजात कष्ट करण्याची भूमिका जास्त आहे. मातंग समाज हा भूमिहीन आहे, असे शरद पवार पुढे म्हणाले.

'मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, ते बदलावे लागेल. असे खूप प्रश्न आहेत. अण्णाभाऊ साठे यांचं योगदान फक्त मातंग समाजासाठी नव्हतं. तर ज्यांना मराठी समजते, त्या सर्वांसाठी होतं. अण्णाभाऊ साठे कर्तृत्ववान नेते होते. त्यांनी बाहेर जाऊन अनेक गोष्टी केल्या, त्यांचं साहित्य खूप मोठं आहे, असेही पवार म्हणाले.

'एखाद्या विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी केली, तर ते वावगं ठरणार नाही. तो त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेला अधिकार आहे. वाटेगावच्या आमच्या अण्णाभाऊ साठे यांनी पुस्तक लिहिले, त्याचा स्वीकार आमच्या कष्टकऱ्यांनी केला, असे शरद पवार पुढे म्हणाले.

Sharad Pawar On Annabhau Sathe
Maharashtra Politics: अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, जयंत पाटलांना केलं पदमुक्त

'राज्य सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाची कर्ज माफ करावीत. केंद्र सरकार देशातील उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ करतं. तर या गरिबांची कर्ज माफ करायला काय हरकत आहे, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com