
अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम (Onion) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik) केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेऊन बंदी हटवावी, असे न केल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)
नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या (Bajar Samiti) मुख्य इमारतीच्या बैठक हॉलमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती, छावा संघटना, शिवसेना उबाठा यासह शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक झाली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी
बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवून सर्व पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच तातडीने निर्यात बंदी न हटविल्यास राज्यवापी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.