बुलडाणा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर होत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासनाने धडक कारवाई केली. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने शहरातील सुमारे ४० हॉटेल्स व प्रतिष्ठानांची तपासणी केली.
या कारवाईदरम्यान ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून एकूण १४ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. अनेक ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅसचा सर्रास वापर होत असल्याचे उघड झाले. काही ठिकाणी कारवाईची माहिती मिळताच सिलेंडर लपवण्याचाही प्रयत्न करण्यात आला... प्रशासनाने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अशा प्रकाराला अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत असून तीन ते चार दिवसावर ईद येऊन ठेपली आहे. ईद निमित्त शहरातील तीन बत्ती बाजारपेठ परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून. नागरिकांनी रमजान निमित्त महिलची व नागरिकांनी एकच गर्दी दिसत आहे . ईद साठी लहान मुलांना कपडे, चप्पल, महिलांसाठी विविध प्रकारचे ड्रेस तसेच महिलांसाठी कॉस्मेटिक सामान घेण्यासाठी महिलांनी बाजार पेठेत एकच गर्दी केली आहे तर दुसरीकडे रमजान निमित्ताने
शेवई खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. आखाती देशात युद्ध सुरू असून याचा परिणाम गॅस सिलिंडर देखील झाले आहे. शेवई च्या किंमती वाढतील असी भिती मनात बाळगून नागरिकांना शेवई च्या दुकानात देखील गर्दी केली आहे.
पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन कडून देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचे दिसत आहे .
शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे.
दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा आणि वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत.
मात्र, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
लोहगाव परिसरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि कोरेगाव पार्क परिसरात ३८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजीनगरसह मगरपट्टा, चिंचवड आणि पाषाण परिसरात हे तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके होते. किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट होऊन ते १७. ७ अंश सेल्सिअस इतके होते
सकाळी आणि सायंकाळी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत असले, तरी दुपारी मात्र उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.
गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या अन्नपुरवठा विभागाच्या जिल्हा प्रशासनाला आदेश
गॅस वितरकांवर काही ठिकाणी हल्ले होत असल्याने त्यांच्या सह वितरण कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आदेश
गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनासह गॅस एजन्सीला देखील संरक्षण देण्याच्या सूचना
अन्न व पुरवठा विभागाने एक परिपत्रक काढले असून गॅस स्थिती पूर्वस्थितीवर येत नाही तोपर्यंत हे लागू असणार आहे
पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असून त्यात पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत
अमरावती जिल्हा नियोजन समिती तर्फे प्राप्त अमरावती महानगरपालिकेच्या शाळांच्या भौतिक सुविधांकरिता २ कोटी इतक्या निधी अंतर्गत महापालिकेच्या ५ शाळांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा बुधवारा येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे., मनपा हिंदी शाळा क्रमांक ७ विलास नगर येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. मनपा मराठी शाळा शेंगांव येथील कंपाऊंड वॉल व वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. मनपा शाळा वडाळी येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. मनपा शाळा नूर नगर येथील वर्ग खोल्याचे बांधकाम करणे. अशी विविध कामे करण्यात येत आहे. यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाचा औपचारिकता साधली. अमरावती क्षेत्रात मनपाच्या एकुण ६३ शाळा सद्यास्थितीत कार्यरत असुन यात मनपाच्या व जिल्हापरिषद कडुन वर्ग (हस्तांतरित) झालेल्या शाळांचा समावेश आहे.
16 मे ते 14 जून मध्ये पुणे महापालिकेकडून होणार जनगणना
भारताची जनगणनाच्या पहिल्या फेरीचे कामकाज १६ मे ते १४ जून रोजी पार पडणार
पुणे महापालिका हद्दीतील १५ क्षत्रिय कार्यालय अंतर्गत करण्यात येणार जनगणना
जनगणना कामकाज निर्देशानुसार १ मे ते १५ मे असा नागरिकांसाठी स्वयंगणना कालावधी असणार
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपदी शिंदेसेनेच्या अस्मिता केंद्रे आणि नेत्रा ठाकूर यांची नावे चर्चेत असून, यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे. तर उपाध्यक्षपदासाठी शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास चाळके यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ गटांमध्ये शिंदेसेनेचे ४१ सदस्य, भाजपचे ४, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि उद्धव सेना यांना प्रत्येकी ५, तर मनसेचा एक सदस्य आहे.. जिल्ह्यात महायुती असली तरी जिल्हा परिषदेवर शिंदेसेनेची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे. त्यात अध्यक्षपदाचा मान उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, गुहागरातून जिल्हा परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर की मंडणगडमधून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अस्मिता केंद्रे अध्यक्षपदाच्य मानकरी ठरणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दोघांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे, हे आज निश्चित होणार आहे.
बोर्ड परीक्षा कॉपी प्रकरणी राज्यातील १०३ कर्मचारी निलंबित
सी सी टिव्ही, ड्रोन तरीही कॉपीबहाद्दर नाही थांबले
सर्वाधिक निलंबित कर्मचारी वाशिम जिल्ह्यात
वाशिम जिल्ह्यात तब्बल ५० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
काही परीक्षा केंद्रांवर मास कॉपी, मोबाईलचा वापर करून उत्तर मिळवणे, बनावट प्रवेश पत्रांच्या आधारे परीक्षेला बसणं तसेच कॉपी करण्यास मदत करणे असे विविध प्रकार
राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात आले होत्या
परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा भरारी पथके तसेच काही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात असताना सुद्धा कॉपी चे प्रकरणं
वाशिम मध्ये 50 त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर मध्ये 21 तर बीडमध्ये 18 कर्मचारी निलंबित
जालना जिल्ह्यात पाच गडचिरोली मध्ये चार धाराशिव मध्ये तीन तर नांदेडमध्ये दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
शेवगाव तालुक्यातील बोधेगावात गोळीबाराची घटना..
कुखायत गुंड सुरेश उर्फ पिण्या कापसे यांनी गणेश कापसेवर केला गोळीबार..
गणेश कापसे यांच्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी...
जखमीला उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल..
आरोपी सुरेश उर्फ पिण्या कापसे काही दिवसापूर्वीच जामीनावर आला आहे बाहेर..
गोळीबाराच्या घटनेनंतर अज्ञाताकडून केली आरोपी पिण्या कापसेलाही बेदम मारहाण...
मारहणीत आरोपी कापसेही गंभीर जखमी; त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले दाखल..
पोलीस आरोपी पिण्या कापसेला पाठीशी घालत असल्याचा जखमी गणेश कापसेने केला आरोप..
अहिल्यानगर जिल्ह्यात काही दिवसापासून गोळीबाराच्या घटनेत वाढ..
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव इथे काल झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मोठ नुकसान झालं आहे... आठ ते दहा घरांची पूर्णतः पडझड झाली असून शेतीचही मोठं नुकसान झालं आहे... आज कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी नुकसानग्रस्त घर आणि शेतीची पाहणी केली... या पाहणी नंतर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अंमल महाडिक यांनी दिल्या आहेत.. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील या पाहणीनंतर आमदार महाडिक सांगितलंय
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी ओडिशातील बालासोरकडे जाताना धावत्या ट्रेनमधील घटना
- मुलींच्या संघासोबत धावत्या रेल्वेत छेडछाडीचा प्रकार
- फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये काही टवाळखोरांची अश्लाघ्य शेरेबाजी
कौटुंबिक वादाने टोक गाठत दिराने आपल्या वयस्कर सख्या भावजईवर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश धोंडीबा सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील नाव्होली गावात मुलानेच सासरच्या लोकांना सोबत घेऊन वडलासह बहिण आणि मेहुण्याला चटणी टाकुन लोखंडी पाईप आणि बेल्टने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर ची चावी आणि जमीन नावावर करून दे म्हणत स्वतःच्या मुलानेच वडिलांसह सोडवा सोडवा करण्यासाठी आलेल्या बहिण आणि मेहुण्याला देखील मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर मुलाने पालीच्या तलावात वडलाला हातपाय बांधून टाकण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीत घेऊन गेल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीचे एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. काही फोटो समोर आले असून मारहाण झाल्याचे अंगावर मोठे व्रण दिसत आहेत. काल रात्री 8 ते 9 च्या दरम्यान हि घटना घडली असुन जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात केज पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संभाजीनगर ते सांगली मध्ये आलेल्या स्लीपर कोच ट्रॅव्हल्स गाडीला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. सांगलीच्या मारुती चौकात सकाळी सहा वाजता आल्यानंतर ही आग लागली. गाडीत सहा प्रवाशी होते ते सुदैवाने सुखरूप बाहेर पडले. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. आणि आग आटोक्यात आणली. मात्र ट्रॅव्हल्स जळुन खाक झाली. यामध्ये प्रवास्याची बॅग ही जळुन खाक झाल्या. यावेळी बघ्याची एकच गर्दी झाली होती.
आखातामध्ये युद्ध भडकल्यानंतर गॅसचा पुरवठा करताना यवतमाळ जिल्ह्यात काही तांत्रिक अडचणी उभ्या झाल्या आहेत यातून ग्रामीण भागात 45 दिवसाच्या अंतराने गॅस पुरवठा केला जाणार आहे तर शहरी भागात 30 दिवसाच्या अंतराने गॅस पुरवठा करण्याच्या सूचना आहेत यामुळे पुढील काळात गॅसधारकांना गॅसचा वापर जपून करावा लागणार आहे निर्धारित काळाच्या मधात गॅस संपला तर पर्यायी व्यवस्थेवरच गॅस धारकांना अवलंबून राहावे लागणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सात लाख 70 हजार गॅस सिलिंडरधारक आहेत.
भंडाऱ्याच्या पवनीत मारुती कारमधील गॅस सिलिंडर गळतीनं आगीची मोठी घटना घडली. पवनी येथील या कारमध्ये गॅस सिलिंडर लावलेला होता. दुपारी दुधाच वाटप करून आल्यावर चालकानं ही कार गांधी चौक परिसरात उभी केली असताना गॅस गळती झाली आणि कार नं अचानक पेट घेतला. बघताबघता आगी नं रौद्ररूप धारण केल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली. पवनी नगर पालिकेच्या अग्निशमन पथकानं तातडीनं घटनास्थळ गाठतं आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाल्यानं कार चालकांचं यात लाखो रुपयांचं नुकसान झालं. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही.
पाच वर्षाचा कार्यकाळ संपलेल्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रारूप प्रभाग रचना तयार करून सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या मात्र 12 मार्चपर्यंत ही प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले नाही त्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासनाला 17 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अपर आयुक्तांनी दिले आहे.
इराण-इस्रायल युद्धाचा भडका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात त्याचे विदारक पडसाद उमटत आहेत. भंडाऱ्यात सध्या गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तासनतास ताटकळत राहूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा संताप आहे. काही ठिकाणी गॅससाठी अवाच्या सव्वा किंमत मोजावी लागत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत. गॅस मिळत नसल्याने ग्रामीण भागातील चित्र बदलले आहे. कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या चुली पुन्हा पेटल्या आहेत. मात्र, या चुली पेटवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला डोक्यावर लाकडाच्या मोळ्या वाहून नेताना दिसत आहेत. एकीकडे आपण प्रदूषणमुक्तीच्या गप्पा मारतोय, तर दुसरीकडे इंधनाच्या टंचाईमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय. युद्ध परदेशात सुरू आहे, पण त्याचे चटके भंडाऱ्यातील सामान्य जनतेला बसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.