Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनावेळी सरकारकडून 'संकटमोचक' म्हणून गेले त्या गिरीश महाजनांवरच मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

Manoj Jarange Patil On Girish : देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगेंनी आज गिरीश महाजनांकडे मोर्चा वळवला आहे. भाजप नेते गिरीश महाजन फसवणारा माणूस असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam Digital
Published On

लोकसभा निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर मनोज जरांगें आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने शिष्टमंडळ पाठवलं होतं. त्या शिष्टमंडळात गिरीश महाजन संकटमोचक म्हणून गेले होते. त्यांच्यावरही आज जरांगेंनी गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवला. गिरीश महाजन फसवतात, आंदोलन फोडण्यासाठी काम करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगेंनी आज गिरीश महाजनांकडे मोर्चा वळवला आहे.

ज्या दिवशी अंतरवाली सराटीत 4 जूनला सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यात गिरीश महाजन होते. ती चर्चा ऐका गाफील राहू नका. त्यादिवशी सगे सोयरेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सर्वांचं एक मत झालं होतं. मात्र गिरीश महाजन म्हणाला सगे सोयरे टिकत नाही. त्यावेळी कळलं होत सरकार कोणाचं नसतं. राजकारणी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करतात.

महाजन साहेब आमचं आरक्षण टिकलं नाही तर नाही टिकूदे, पुन्हा आंदोलन करू. मला माहितेय सगे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर आरक्षण टिकणारच. मला माहित होतं तुम्ही डाव टाकणार, मात्र मी क्षत्रिय मराठ्यांचा आहे.विदर्भातील मराठ्यांचा आणि आपला व्यवसाय एकच आहे. माझ्या राज्यातील एकही मराठा अरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे. ज्या मराठ्यांची नोंद सापडेल अन् त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, ही आमची मागणी आहे.

Manoj Jarange Patil
IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरच्या वडिलांनी लढवली होती लोकसभा निवडणूक; कोण होतं विरोधात? काय म्हणाले वाचा सविस्तर

लेकरावर अन्याय झाल्यावर दंड थोपटून कसं बाहेर यावं लागतं हे बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी दाखवून दिलं. सरकारने मराठ्यांवर पुन्हा एकत्र येण्याची वेळ आणू नये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना जाहीरपणे सांगतोय, हा आक्रोश पहा, इतक्या उन्हात हा मराठा समाज इथं बसला आहे. लेकरांच्या न्यायापायी इथला मराठा काहीच विचार करत नाही. बीड जिल्ह्यातील सर्वच मराठा आता ताकदीने उभा ठाकला असल्याचं जरांगें म्हणाले.

Manoj Jarange Patil
Nagpur News : आजीला भेटण्यासाठी 1500 किमीवरून नागपूरला आली अन् घात झाला; महापालिकेच्या 'आपली बस'ने ६ वर्षांच्या बालिकेला उडवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com