
आज महाराष्ट्र बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे.मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल कमी लागला आहे.दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना १ वाजता अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. दहावीचा निकाल कमी लागला असला तरीही तब्बल २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
२११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
दहावीच्या परीक्षेत २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळवले आहे. यामध्ये लातूरच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळवले आहे. लातूरमधील ११३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निकालात लातूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली, असं म्हणायला हरकत नाही.
कोणत्या विभागात किती विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण?
पुण्यातील १३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. नागपूर ३ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे.संभाजी नगरमध्ये ४० विद्यार्थी तर मुंबईत ८,कोल्हापूरमध्ये १२ विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत. अमरावतीत ११, नाशिकमध्ये २ तर कोकणात ९ विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवले आहेत.लातूरमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहे. ११३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत कोणत्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत हे १ वाजता समजेल. १ वाजता तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने रिझल्ट पाहता येणार आहे. यासाठी बोर्डाने वेबसाइट जारी केल्या आहेत. याचसोबत तुम्ही Digilocker वरुन रिझल्ट डाउनलोड करु शकतात.
या वेबसाइटवर पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
mahahsscboard.in
ssc.mahresults.org.in
sscresult.mkcl.org
maharashtraeducation.net
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.