तृतीयपंथींसाठी कल्याण महामंडळ; शिंदे गटातील आमदाराच्या पत्राची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता, कारण...
Eknath Shinde
Eknath Shinde Saam TV

ठाणे : आपण सरकार म्हणून ’कल्याणकारी राज्य“ ही संकल्पना ध्यानात ठेऊन सर्व समाज घटकांसाठी काम करीत आहोत. वंचित, दुर्लक्षित व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वर्गाच्या कल्याणासाठी हे सरकार संवेदनशील आहे आणि अधिक गांभीर्याने लक्ष देत आहे. समाजात असलेले तृतीयपंथीयांच्या विविध मागण्या (Transgender demand) प्रलंबित आहेत. तृतीयपंथीय समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी गेल्या अधिवेशनात त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या. त्यांच्या या गंभीर समस्येबाबत शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राची शिंदे यांनी दखल घेतली असून तृतीयपंथींसाठी कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. (Transgender Latest News update)

Eknath Shinde
त्याच बुडबुड्याने तुमची धुलाई..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

तृतीयपंथीयांना समाजात बहिष्कृत केले जाते किंवा वाईट वागणूक मिळते. तृतीयपंथीयांना रोजगार नसल्याने ते भीक मागताना, ट्रॅफिक सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी दिसतात. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबणा होते. त्यामुळे अशी शौचालये तातडीने बांधणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र सेल, रेल्वेगाडीत महिलांसाठी असते तशी तृतीयपंथीयांसाठीच स्वतंत्र बोगी,सरकारी अर्जामध्ये स्त्री,पुरूष याप्रमाणेच तृतीयपंथी असा तिसरा कॉलम असावा,यासह त्यांच्या रोजगार,घर,शिक्षण याबाबत अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत.

Eknath Shinde
सुप्रियाताईंना २ मुख्यमंत्र्यांची सवय, रिमोट काढून घेतल्याने नाराजी; मुख्यमंत्र्यांचे पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र

तृतीयपंथीयांच्या हितासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने ’उत्तर प्रदेश किन्नर कल्याण मंडळाची“ स्थापना केल्याचे मला समजले. महाराष्ट्र हा प्रगत तर आहेच पण देशाला दिशा दाखविणारे राज्य आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या हितासाठी ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामध्ये तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे शिक्षण,रोजगार,घर आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी काम करण्यासाठी हे महामंडळ आवश्यक आहे. तृतीयपंथीयांच्या सर्व मागण्या,त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी काम होणे आवश्यक आहे.

Eknath Shinde
स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी कोण?; या २ शिष्यांकडे सोपवली जबाबदारी

हे काम समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत होणे आवश्यक असल्याचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राची दखल घेऊन किन्नरासाठी ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com