जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून जाहीर केले आहे, की माझ्याकडून कोणतेही अडचण नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने मुख्यमंत्री पदाचा विषय संपलेला आहे. यामुळे ते नाराज राहण्याचा विषयच येत नाही. आगामी काळात शिवसेना पक्षाने सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना पक्ष जो ही निर्णय घेईल; ते सर्व एकछत्री पद्धतीने एकनाथ शिंदे हेच घेतील; अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्रीपदाचा तोडगा निघत नसल्यामुळे (eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार (Gulabrao Patil) गुलाबराव पाटील हे देखील आज जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली
सर्वसामान्य जनतेचे काम केलीत
एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यामुळे ते जसा आदेश देतात, त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचे काम केले आहेत. त्यामुळे लोकांना ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावं; असं वाटणं स्वाभाविक आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट सांगून टाकले आहे; की याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे असतील.
विरोधकांकडून रडीचा डाव
मी सहाव्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळे ज्या गावात मी मायनस राहील असे वाटत होते; त्या गावात निकालानंतर बघितले, तर मी खरच मायनस होतो. विरोधकांकडून लहान मुलांप्रमाणे रडीचा डाव चाललेला आहे. निवडून आले तर ईव्हीएम चांगले आहे आणि पडले तर ईव्हीएम खराब आहे.
राऊतांना दवाखान्यात ऍडमिट केले पाहिजे
संजय राऊत हा माणूसच राहिलेला नाहीये. त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे. आधी त्यांनी शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता स्वतःही संपेल. संजय राऊत मेंटल झालाय. त्याच्या हातात दगड द्या, दगड घेऊन भिवंडीच्या बाजारात फिर म्हणा. अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.