1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

Gadchiroli Ashram School : गडचिरोलीत आश्रमशाळेतील संपर्दशांच्या दुर्घटनेने राज्य हादरलंय. यावरुन संजय राऊतांनी गडचिरोलीतील कायदा व सुव्यवस्थेवरुन धक्कादायक दावा केलाय. तर तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या सरकारने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी निश्चित केलीये. पाहूया एक खास रिपोर्ट.
1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप
Published On

जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशीच रात्री गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. धानोरा तालुक्यातल्या जपतलई येथील घटनेमुळे मोठू खळबळ उडालीय़. यात तीन मुलींची प्रकृती अजूनही चिंताजनक असून १४ विद्यार्थिनी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. या गंभीर घटनेवरुन ठाकरेसेनेने गडचिरोलीतल्या कारभारावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. गेल्या वर्षभरात तब्बल १५०० आदिवासींचा मृत्यू झाला असून त्यांच्या पाच मिनिटांत बॉड्या गायब करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप
मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यामुळे राऊतांनी मरण इतकं स्वस्त झालंय? असा सवाल करत वर्षा बंगल्यावर साप सोडा, असा टोला राऊतांनी लगावलाय. तर संस्था कोणाची आहे हे पाहा असं म्हणत विरोधकांच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलंय. विरोधकांच्या चौफेर टीकेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. आता आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी निश्चित करण्यात येणार आहे. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आश्रमशाळेला भेट देत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची शासकीय मदत जाहीर केली आहे.

काँग्रेसचे माजी आमदार मारोतराव कोवासे यांची ही आश्रमशाळा आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत तर आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, अशी सूचना केली आहे. दरम्यान सर्पदंशाने गंभीर असलेल्या एका मुलीच्या पालकांनी साम टीव्हीशी संवाद साधला. आपल्या मुलीचं पोलिस बनण्याचं स्वप्न आहे. मात्र तीची सध्या मृत्युशी झुंज सुरु असल्याचं सांगितलं.

राज्यातील अनेक आश्रमशाळांमधील भोंगळ कारभार यापूर्वीही समोर आलाय. विद्यार्थ्यांना सुविधा न देता शासकीय अनुदान लाटण्यात मग्न असलेले संस्थाचालक आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना चाप कधी बसणार? यंत्रणा आणखी किती निष्पाप मुलींचा बळी घेणार ? हाच खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com