Sangli Crime News: 11 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; पती-पत्नीनं मृत्यूला कवटाळलं, सुखी संसाराची स्वप्ने एका रात्रीत उद्ध्वस्त

Sangli Couple End Life: विष प्राशन करुन या दाम्पत्यानी आपले जीवन संपवले आहे.
Sangli Couple End Life
Sangli Couple End LifeSaam Tv
Published On

Sangli News: लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी गावामध्ये ही घटना घडली आहे. विष प्राशन करुन या दाम्पत्यानी आपले जीवन संपवले आहे. या नवदाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा तपास सांगली पोलिसांकडून सुरु आहे.

Sangli Couple End Life
Solapur Accident News: देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; टँकर आणि जीपमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील येळावी गावामध्ये राहणाऱ्या राज संजय जाधव (23 वर्षे) आणि त्यांची पत्नी ऋतुजा राज जाधव (20 वर्षे) यांनी बुधवारी विष प्राशन करुन आत्महत्या केली. बुधवारी रात्री राज यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर राज आणि ऋतुजा हे आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले. तर त्याचे कुटुंबीय दुसऱ्या खोलीमध्ये झोपले. पण रात्री दीडच्या सुमारास राज यांच्या खोलीतून कोणी तरी उलट्या करत असल्याचा आवाज येत होता. त्यामुळे राज यांच्या वडिलांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली.

Sangli Couple End Life
Cricket Funny Video: बॉल ऑफ द सेंच्युरी! घरात खेळत होते क्रिकेट,बॉलऐवजी भावाने स्वतःच उडवली विकेट; पाहा मजेशीर VIDEO

त्यांनी घरातील इतर सदस्यांच्या मदतीने राज यांच्या खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तर राज आणि ऋतुजा दोघेही बेशुद्धावस्तेत दिसून आले. त्यानंतर राज यांच्या कुटुंबियांनी दोघांनाही तातडीने तासगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रूग्णालयमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले.

Sangli Couple End Life
Rahul Gandhi In Manipur : मणिपूर हिंसाचारावर राहुल गांधींना चिंता; म्हणाले, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलोय

राज आणि ऋतुजा यांनी आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

दरम्यान, राज आणि ऋतुजा यांचा विवाह 11 महिन्यांपूर्वी झाला होता. राज यांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते. सध्या ते घरचीच शेती करत होते. तर त्यांची पत्नी ऋतुजा ही गृहिणी म्हणूनच काम करत होती. राज हे पत्नी, आई-वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत एकत्र राहत होते. राज आणि ऋतुजा यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसंच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com