Eknath Shinde : पालघरमध्ये १२ लाख रोजगार, कोस्टल रोडचा विरार- पालघरपर्यंत विस्तार, मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?

CM Eknath Shinde Speech: 'मोदींच्या नेतृत्वात आता देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत जगाची महासत्ता म्हणून उदयास येईल," असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
CM Eknath Shinde: पालघरमध्ये १२ लाख रोजगार, कोस्टल रोडचा विरार- पालघरपर्यंत विस्तार, CM एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या घोषणा!
CM Eknath ShindeSaam TV
Published On

गणेश कवाडे, पालघर|ता. ३० ऑगस्ट २०२४

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणीचा शुभारंभ केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

CM Eknath Shinde: पालघरमध्ये १२ लाख रोजगार, कोस्टल रोडचा विरार- पालघरपर्यंत विस्तार, CM एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या घोषणा!
Pune Crime : ना डोकं, ना हाथ, ना पाय; पुण्याच्या मुठा नदीकाठावर वाहून आलेल्या त्या मृतदेहाचे गूढ कायम

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"आजचा दिवस पालघरच्या इतिहासात व महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील सोनेरी दिवस आहे. हा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे. महाराष्ट्राला तर याचा फायदा होईलच, पण आपल्या देशाला व पालघरच्या जनतेला सर्वाधिक होईल.आज मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे, मोदींच्या हातात सफलतेचा पारस आहे. जसे भूमिपूजन झाले, तसेच बंदराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल, असा विश्वास व्यक्त करतो," असे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आयात निर्यातीस चालना मिळेल!

तसेच "पंतप्रधान मोदींच्याच हस्ते भूमिपूजन व्हावा असा योग असणार, त्यामुळे इतक्या वर्षांनंतर हे बंदर मार्गी लागत आहे. डहाणू पालघर हे जगाच्या नकाशावर मोलाचे स्थान मिळवणार आहे. हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे, या बंदरामुळे आयात व निर्यातीस चालना मिळेल. भारत जागतिक व्यापारात अजून समर्थ पणे उतरू शकेल," असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

CM Eknath Shinde: पालघरमध्ये १२ लाख रोजगार, कोस्टल रोडचा विरार- पालघरपर्यंत विस्तार, CM एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या घोषणा!
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला मोठा धक्का; बडा नेता लवकरच तुतारी फुंकणार

स्थानिकांना रोजगार मिळेल!

"स्थानिकांना रोजगार, नोकरी मिळेल, वाढवण बंदर विकासात मच्छीमार बंदर व स्थानिकांना न्याय दिला जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, पर्यावरणाची आपण काळजी घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण चालवत आहोत. आता नरीमन पॉईंट पासून कोस्टल रोड विरार, ते पालघर पर्यंत आणण्याचा सरकारचा विचार आहे. सिंगापूर, कोलंबो या बंदरांवर आता भारताला अवलंबून राहावे लागणार नाही," असेही ते म्हणाले.

२०४७ पर्यंत भारत महासत्ता!

"दिघी पोर्टच्या विकासाला केंद्र सरकारने आता हिरवा झेंडा दाखवला आहे. म्हणून दिघी पोर्ट शेजारी हे दुसरे औद्योगिक मोठे बंदर असेल. पंतप्रधानांचे मी आभार मानतो. मुंबईला वैष्विक फिनटेक शहरात बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. मुंबई महानगरासह पालघर, रायगड विकासावर आता लक्ष केंद्रित केले जाते आहे. २०३० पर्यंत २६ लाख कोटींपर्यंत एमएमआर विभागाची उलाढाल नेण्याचा विचार आहे. मोदींच्या नेतृत्वात आता देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत जगाची महासत्ता म्हणून उदयास येईल," असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

CM Eknath Shinde: पालघरमध्ये १२ लाख रोजगार, कोस्टल रोडचा विरार- पालघरपर्यंत विस्तार, CM एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या घोषणा!
Crime News : महिलांवर बलात्कार करणाऱ्यांची आता खैर नाही, ७ दिवसातच फासावर लटवणार? मुख्यमंत्री मांडणार विधेयक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com