Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या घटनेबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितलीय.
Ajit Pawar : मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त
Ajit Pawar
Published On

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळल्या घटना घडली. या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितलीय. या संदर्भात मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो, असे अजित पवार सभेत म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. वर्षभरात त्यांचा असा पुतळा कोसळणे हा आपल्या सर्वांसाठी धक्कादायक असल्याचंही ते म्हणाले.

अजित पवार यांची जन सन्मान यात्रा लातूर जिल्ह्यात पोहोचलीय.यावेळी येथील नागरिकांना संबोधित करतांना अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागितलीय.याप्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई केली जाणार असणार असल्याचं वक्तक्य त्यांनी केलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जनतेचं दैवत आहेत, मी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो, विधान अजित पवार यांनी केलंय.

जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. आता वृत्तपत्रांमध्ये पुतळा पडण्याच्या घटनेला कोण दोषी आहेत, त्यांची नावे समोर येत आहेत, यात जे कोणी दोषी असतील मग यात कोणी मोठा असो किंवा लहान अधिकारी सर्वांवर कारवाई केली जाईल, असं अजित पवार म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी या पुतळ्याचे अनावरण केले होते. बरोबर ८ महिन्यांनंतर २६ ऑगस्ट रोजी पुतळा पडल्याची घटना घडली. या प्रकरणी पुतळा उभारणीच्या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीनुसार, पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आलाय. पुतळ्यासाठी वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले आढळल्याचं म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस यांनीही दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलंय. मालवणच्या घटनेवर कोणी राजकारण करू नये. ही घटना कमीपणा आणि दुःखद घटना आहे. योग्य चौकशी करत दोषींवर कारवाई केली जाईल. ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. याआधी उद्धव ठाकरे यांनी आणि शरद पवार यांनी सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केलाय.

Ajit Pawar : मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त
Rajkot Shivaji Mahajar Statue: चुका पुन्हा घडणार नाहीत, ज्यांनी केल्या त्यांना शिक्षा होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com