
योगेश काशिद, साम टीव्ही
बीडच्या वसंतनगर ग्रामपंचायतच्या महिला सरपंचसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत ५ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींना अंबाजोगाई दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर हल्लाखोरांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. सरपंचपदाचा राजीनामा का देत नसल्याने १५ ते २० जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी तालुक्यातील लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वसंतनगर ग्रामपंचायत महिला सरपंचसह कटुंबावर गावातील १५ ते २० लोकांनी प्राण घातक हल्ला केला. सरपंचदाचा राजीनामा का देत नाही म्हणून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सरपंचाच्या राठोड कुटुंबातील ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचावर अंबाजोगाई येथील स्वराती सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हल्लाखोरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राठोड कुटुंबीयांनी केली आहे.
वसंतनगर तांडा येथे रात्री नऊ वाजता माजी सरपंच दत्तात्रय सखाराम राठोड यांच्या सांग्यावरून महिला सरपंच शाहूबाई विजय राठोड सरपंचपदाचा राजीनामा का देत नाही म्हणून पूर्ण कुटुंबावर जीवघेणा करण्यात आला. या गावातील रवी रामराव चव्हाण, विकास रामराव चव्हाण , अजित बबन चव्हाण , नितीन गजानन उर्फ गजानद चव्हाण, अभिजित बबन चव्हाण आणि इतर पंधरा ते वीस जणांनी मिळून सरपंचसह कुटुंबातील आठ जणांवर प्राणघातक हल्ला केला.
त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार माजी सरपंच दत्ता सखाराम राठोड असल्याची प्रतिक्रिया महिला सरपंचपाचे विजय राठोड यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.