Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat : भोंदू खरातने अधिकारी आणि राजकीय नेत्यांना हाताशी धरुन मोठा कारनामा केलाय. त्याने चक्कं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवलंय. मात्र ते नेमकं कसं? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Fresh allegations in Kharat case point to diversion of water meant for farmers, sparking outrage.
Fresh allegations in Kharat case point to diversion of water meant for farmers, sparking outrage.
Published On

ज्योतिषशास्त्राच्या आडून महिलांना जाळ्यात ओढणारा, महिलांवर अत्याचार करणारा ढोंगी कॅप्टन खरात. एसआयटीनं कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे एकेक कारनामे समोर यायला सुरुवात झालीय. नराधम खरातने सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या शिवनिक संस्थानसाठी त्यानं राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मराठवाड्यातील दुष्काळी भागातील 72 हजार शेतकऱ्यांच्या हक्काचं 39 लाख लीटर पाणी पळवण्याचं पाप केलंय.

Fresh allegations in Kharat case point to diversion of water meant for farmers, sparking outrage.
Ashok Kharat Case: लॅपटॉप,हार्ड डिस्क आणि...; भोंदूबाबा अशोक खरातच्या घरात पोलिसांना काय-काय सापडलं?

नराधम खरातने शिवनिका ट्रस्टच्या परिसरात बाग बगिचा लावला. त्यासाठी राजकीय वजन वापरुन पाणी आणण्यासाठी 48 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. त्यासाठीचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याला पाठवण्यात आला. पुढे पाटबंधारे खात्यानं हा प्रस्ताव गोदावरी महामंडळाला पाठवला. तत्कालिन कार्यकारी संचालकांनी 5 जानेवारी 2020 ला हा प्रस्ताव मंजूर करुन सरकारला पाठवला. पुढे दारणा धरणातून मिरगावच्या शिवनिका ट्रस्टला 39 लाख लीटर पाणी देण्यासाठी जलसंपदा खात्यानं 31 जुलै 2020 रोजी प्रस्तावाला मंजूरी दिली. आणि गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर शेती वापरासाठी 39 लाख लीटर पाणी देण्यात आलं.

Fresh allegations in Kharat case point to diversion of water meant for farmers, sparking outrage.
Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने खरातच्या संस्थानला पाणी देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरुन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. तर पाणी कुठं मुरतंय? याची चौकशी करण्याची मागणी ठाकरेंनी केलीय. बडे अधिकारी, राजकीय नेत्यांशी अभद्र युती करत शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी काळे कारनामे करणाऱ्या खरातच्या संस्थानला दिलं गेलं .शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खरातसारख्या नराधमाला देणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांवरही कारवाई करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com