
सचिन कदम, साम टीव्ही
रायगड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. राज्यातील लाडक्या बहिणींच्या साथीने महायुती सरकारच्या स्थापनेसाठी मोठा हातभार लागला. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मते दिली. महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. या लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा लोकांमध्ये अधूनमधून होत आहे. याच लाडकी बहीण योजनेवर मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे.
आज मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, 'राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे. या सरकारने एकही निकष बदललेला नाही. पुढेही या योजनेचा निकष बदलला जाणार नाही'.
'चालू वर्षात दोन कोटी एक्केचाळीस लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. या लाडक्या बहिणी स्वत:हून पुढे येऊन प्रगतीबाबत सांगत आहेत. तसेच स्वत:ला लाभ नको, असे सांगत आहेत. त्या लाडक्या बहिणींबाबत निर्णय घेणे सुरु आहे. या योजनेमुळे सुरुवातीपासून विरोधकांना धास्ती वाटत आहे. त्यामुळे चुकीचा प्रसार माध्यमातून केला जात आहे. मात्र, ही योजना अशाच पद्धतीने चालू राहील, असेही तटकरे यांनी सांगितले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत आदिती तटकरे म्हणाल्या, 'पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. ज्याची त्याला जबाबदारी मिळेल, पदाची इच्छा व्यक्त करणे काही गैर नाही. मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था देखील चांगली कशी राहील, याचे भान जपले पाहिजे. एक मंत्री म्हणूनही जबाबदारी आहे, असा खोचक टोला आदिती तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना नाव न घेता लगावला. आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मंत्री भरत गोगावले काय प्रतिक्रिया देतील, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.