Love Life Tips : नात्यात बरेदा छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होतात. खरेतर पती-पत्नीचे नाते हे आरशासारखे असायला हवे. त्यात कोणत्याही गोष्टी या नेहमी पारदर्शक असायला हव्यात. नातं फुलवण्यासाठी व टिकवण्यासाठी त्यात विश्वास व प्रेम गरजेचे असते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रेम किंवा वैवाहिक जीवनात दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे. आयुष्यात अनेक वेळा पती पत्नी काही कारणांमुळे दुखावले जातात त्यामुळे नात्यात दूरावा येतो. जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे नात्यात दूरावा येतो ते.
1. संवाद
अनेकदा कामाच्या किंवा कुटुंबामुळे पती पत्नीला (Husband Wife) स्वत:साठी पुरेसा वेळ मिळत नाही. ते त्या कामात इतके व्यस्त होतात की, त्यांना एकमेकांशी बोलायला देखील वेळ नसतो. नातं (Relationship) अधिक घट्ट करण्यासाठी व ते टिकवण्यासाठी संवाद हा अधिक महत्त्वाचा असतो.
2. आदर
नात्यात कधीच नवरा-बायकोने एकमेकांना कमी लेखू नये. कधी कधी आपण एकमेकांना डावलतो त्यामुळे नात्यात दूरावा येतो. नेहमी आपल्या पार्टनरला (Partner) त्याचा कामात प्रोत्साहन द्या. त्यांचा आदर करा
3. चूक स्वीकारणे
जर नात्यात आपल्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर आपण ती स्वीकारायला हवी. त्यामुळे नातं अधिक मजबूत होतं. आपण आपली चूक कधीच मानायला तयार नसतो. यामुळे नातं टिकण्याऐवजी ते अधिक बिघडत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.