Asha Bhosle: गायिका आशा भोसले यांच्या आयुष्यातील थक्क करणारा 'तो' किस्सा पुन्हा चर्चेत; तरुणाईला प्रेरणा देणारी कहाणी

Asha Bhosle Story: जाणून घ्या गायिका आशा भोसले यांच्या आयुष्यातील तो टप्पा जेव्हा गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या सोबत नाते संपवले.
Asha Bhosle
Asha BhosleSaam Tv
Published On

Asha Bhosle: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या आयुष्यातील एक थक्क करणारा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आपल्या मोठ्या बहिणीच्या, म्हणजेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या, सेक्रेटरीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. या घटनेने त्याकाळी त्यांच्या कुटुंबात आणि समाजात खळबळ उडाली होती.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. त्यांचे बालपण संगीताने भरलेले होते, पण त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच नाट्यमय ठरले. १९४९ मध्ये, वयाच्या १६व्या वर्षी, आशा यांनी गणपत राव भोसले यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केले. गणपत राव हे लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते आणि आशा यांच्यापेक्षा वयाने ते बरेच मोठे होते. या लग्नाला आशा यांच्या कुटुंबाचा विरोध होता, विशेषतः लता मंगेशकर यांनी याला तीव्र नापसंती दर्शवली होती.

Asha Bhosle
Virat Kohli: किंग कोहली करणार टीव्हीवर डेब्यू? 'या' मालिकेत दिसणार विराट, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

या लग्नानंतर आशा यांनी आपले करिअर आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. आशा भोसले आणि गणपत राव यांना तीन मुले झाली हेमंत, वर्षा आणि आनंद. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. वैयक्तिक मतभेद आणि आर्थिक अडचणींमुळे आशाताईंनी आणि गणपत राव यांच्यासोबत १९६० मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर आशा यांनी आपल्या मुलांचा सांभाळ करत स्वतःचे संगीत करिअर पुन्हा नव्याने उभे केले.

Asha Bhosle
Sachin Tyagi : मुस्लीम पत्नीसाठी 'हा' हिंदू अभिनेता ठेवतो रोजा; चाहते म्हणाले, 'समाजाला एकत्र आणण्यासाठी...'

आशा भोसले यांनी नंतर १९८० मध्ये संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले, जे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरले. पण त्यांचे पहिले लग्न आणि त्यामागील कहाणी आजही अनेकांना आश्चर्यचकित करते. त्याकाळी अशा प्रकारे पळून जाऊन लग्न करणे ही खूप धाडसी बाब होती, आणि आशा यांनी हे पाऊल उचलून आपल्या स्वतंत्र विचारसरणीची झलक दाखवली होती.

आशा भोसले यांनी आपल्या गायनाने संगीत विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी १२,००० हून अधिक गाणी गायली आणि अनेक भाषांमधील गाण्यावर आपली छाप सोडली. त्यांचे पहिले लग्न भलेही वादग्रस्त ठरले, पण त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि मेहनतीने सर्व अडचणींवर मात केली. आजही त्यांच्या या कहाणीची चर्चा होते आणि नव्या पिढीला त्यांच्या धैर्याची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com