

सध्याच्या वाढत्या महागाईमुळे महिलांना खूप हालाखीच्या परिस्थित राहावं लागतं. ज्यांचे वार्षिक उत्पन्न किंवा मासिक पगार हा खूप कमी आहे, त्यांना कुटुंब चालणवणं फारच अवघड झालं आहे. याचाच विचार करून मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये लाडक्या बहिणींना दरमहा ३००० रुपये दिले जाणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अन्नपूर्णा भंडार योजना या खास योजनेमध्ये पश्चिम बंगालमधील नागरिकांना दरमहा म्हणजे येत्या १ जूनपासून महिलांना दरमहा ३००० रुपये मिळतील अशी आनंदाची घोषणा केली आहे. हे पैसे थेट खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस सेवेचाही लाभ घेता येणार आहे.
अन्नपूर्णा भंडार योजनेचा लाभ हा पश्चिम बंगालमधल्या रहिवाशी महिलांनाच घेता येईल. तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यात वार्षित उत्पन्न कमी असायला हवे, वय २५ वर्षांपेक्षा जास्त आणि महत्वाचं म्हणजे, रेशन कार्डात महिलेचं नाव असणं गरजेचं आहे.
सध्या अन्नपूर्णा भंडार योजनेच्या अर्जाची सुरुवात करण्यात आलेली नाही. पण तुम्हाला जूनपासूनचे हप्ते एकत्र दिले जातील. या योजनेचे अधिकृत पोर्टल लॉन्च केल्यावर पात्र महिला त्यांचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड टाकून नोंदणी करू शकू शकतात. याचे हप्ते दरमहा खात्यात जमा झाल्याने आर्थिक भार नक्कीच कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.