Follow on to Bangladesh saam tv
Sports

Ind vs Ban: टीम इंडियाने बांगलादेशाला का नाही दिला फॉलोऑन? 'या' कारणाने रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय!

Ind vs Ban: चेपॉक टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १४९ रन्सवर बांगलादेशाच्या सर्व फलंदाजांना माघारी धाडलं. लंदाजांनी उत्तम कामगिरी करून देखील भारताने बांगलादेशाला फॉलोऑन का दिला नाही याचं कारण तुम्हाला माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या चेपॉक मैदानावर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवला जातोय. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशाच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १४९ रन्सवर बांगलादेशाच्या सर्व फलंदाजांना माघारी धाडलं. यामध्ये जसप्रीत बुमराहने ५० रन्स देत ४ विकेट्स घेतले. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करून देखील भारताने बांगलादेशाला फॉलोऑन का दिला नाही, असा सवाल आता चाहत्यांच्या मनात आहे.

टीम इंडियाकडे मोठी आघाडी

जसप्रीत बुमराह शिवाय भारताकडून मोहम्मद सिराज, आकाश दीप, रविंद्र जडेजा यांनी २-२ विकेट्स घेतले. भारताने पहिल्या डावात ३७६ रन्स केले होते. अशावेळी बांगलादेशाची टीम ऑलआऊट झाल्यानंतर भारताकडे फॉलोऑन देण्याची संधी होती. मात्र तरीही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.

भारताने का दिला नाही फॉलोऑन?

जर भारताने बांगलादेशाला फॉलोऑन देऊन लवकर विकेट्स पटकावले असते तर सामना देखील लवकर संपला असता. मात्र टीम इंडियाने तसं केलं नाही. याचं कारण म्हणजे वेगवान गोलंदाजांवरील वर्कलोड. चेन्नईचं पीच वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. अशावेळी दुसऱ्या डावात देखील गोलंदाजी केली तर भारतीय गोलंदाजांना दुखापत होण्याचा धोका अधिक होता. याच कारणाने कर्णधार रोहित शर्माने भारतासाठी फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसऱ्या डावात भारताचे ८१ रन्स

टीम इंडियाच्या पहिल्या डावात भारताच्या फलंदाजांचा खेळ काही फारसा चांगला झाला नव्हता. तर दुसऱ्या डावात देखील टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज फेल झाल्याचं पहायला मिळालं. रोहित शर्मा ५ रन्स, यशस्वी जयस्वाल १० रन्स तर विराट कोहली १७ रन्सवर माघारी परतले. दुसऱ्या डावात ३ विकेट्स गमावून भारताने ८१ रन्स केले आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून फलंदाज कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कर्णधार रोहित शर्माचा अनोखा विक्रम

बांगलादेश विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरलेला दिसून आला. असं असलं तरीही कर्णधार म्हणून त्याने एक मोठा विक्रम केला आहे. रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध टेस्ट सामन्यापूर्वी 2024 या वर्षात 25 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 990 रन्स केलेत. तर हिटमॅनच्या तुलनेत इतर टीमच्या कर्णधारांना 600 रन्सचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नव्हता. मात्र बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यातील दोन्ही डावानंतर रोहित शर्मा 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 1 हजार धावांचा टप्पा गाठणारा सध्याच्या घडीला एकमेव कॅप्टन ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT