Team India Tension Increased Due To These 5 Reasons Ahead Of T20 World Cup 2024 twitter
Sports

T20 World Cup 2024: T-20 वर्ल्डकप तोंडावर असताना या ५ कारणांमुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन

Team India, T20 World Cup 2024: आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील फायनलचा सामना २६ मे रोजी खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र या संघात स्थान दिलेल्या खेळाडूंपैकी प्रमुख खेळाडूंना आयपीएल २०२४ स्पर्धेत आपली छाप सोडता आलेली नाही.

रोहित - जयस्वाल आऊट ऑफ फॉर्म

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. मात्र या दोघांनीही आयपीएल २०२४ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे. या दोघांचा रेकॉर्ड पाहिला तर, रोहितने आयपीएल २०२४ स्पर्धेतील १३ सामन्यांमध्ये त्याने ३४९ धावा केल्या आहेत. तर १०५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. १३ सामन्यांमध्ये त्याला केवळ एकदाच ५० धावांचा आकडा पार करता आला आहे. तर यशस्वी जयस्वालने १३ सामन्यांमध्ये ३४८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं आहे.

रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनची कामगिरी

सूर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याला सातत्य टिकवून ठेवता आलेलं नाही. असच काहीसं संजू सॅमसन आणि रिषभ पंत या दोघांच्या बाबतीत पाहायला मिळालं आहे. या दोघांपैकी एकाला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते.

हार्दिक, जडेजाचा फॉर्म

आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाचं नेतृत्व करताना नेतृत्वासह तो फलंदाजी आणि गोलंदाजीतही फ्लॉप ठरला आहे. तर दुसरीकडे डावखुरा हाताचा खेळाडू रविंद्र जडेजा देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

गोलंदाजी

भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप जिंकायचा असेल तर, गोलंदाजांनी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र दोघेही सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकात विकेट्स काढून देण्यात अपयशी ठरले आहेत.

विराट - बुमराहवर संघाची मदार

त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संचाची मदार ही जसप्रीत बुमराह आणि फलंदाजीत विराट कोहलीवर असणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT