रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना येत्या २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत मुंबईचा पुढील सामना जम्मू काश्मीर संघाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे.
या संघात रोहित शर्माला देखील स्थान देण्यात आलं आहे. स्टार खेळाडूंनी भरलेल्या मुंबईच्या संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल आणि शार्दुल ठाकूर सारखे स्टार खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत.
एकटा रोहित शर्मा नव्हे तर ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवणारा यशस्वी जयस्वाल देखील रणजी ट्रॉफी स्पर्धेत कमबॅक करताना दिसणार आहे. जयस्वालला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी दिली गेली होती. या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेतला.
जम्मू - काश्मीरविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी बीसीसीआयने मुंबईचा संघ जाहीर केला आहे. या संघाची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या हाती असणार आहे. रोहित आणि जयस्वालची जोडी सलामीला येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हा सामना रोहित शर्मासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती.
आऊट ऑफ फॉर्म रोहितला कर्णधार असून सिडनी कसोटीत विश्रांती दिली गेली होती. आता त्याने फॉर्ममध्ये परतण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला. कारण इथून पुढे भारताला इंग्लंडविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळायची आहे. हा सामना २३ जानेवारीपासून बीकेसीतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (यष्टिरक्षक), आकाश आनंद (यष्टिरक्षक), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी , सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, कर्ष कोठारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.