team-india saam tv news
Sports

IND vs SA 2nd T20I: द.आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा पराभव का झाला? ही आहेत ४ प्रमुख कारणं

Reasons Behind Team India Defeat: या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं?

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd T20I:

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसाने व्यत्यत आणलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकअखेर ७ गडी बाद १८० धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान १५ षटकात पूर्ण करायचं होतं. दरम्यान आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ७ चेंडू शिल्लक ठेवत हा सामना जिंकला. दरम्यान काय आहेत या पराभवाची प्रमुख कारणं?जाणून घ्या.

खेळपट्टी..

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. भारतीय फलंदाज जेव्हा फलंदाजी करत होते. त्यावेळी खेळपट्टी स्लो असल्याचं दिसून आलं. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना तबरेज शम्सीने १८ धावा खर्च केल्या आणि १ विकेट घेतला. तसेच एडेन मार्करमने देखील १ विकेट मिळवली. त्यामुळे भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसून आले.

पाऊस आणि ओलं मैदान..

भारतीय संघाची फलंदाजी झाल्यानंतर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फलंदाजीला आल्यानंतर आऊटफिल्ड ओली होती. हेच प्रमुख कारण होतं की, भारतीय गोलंदाजांना चेंडू ग्रीप करताना अडचणीचा सामना करावा लागत होता. याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झाला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Latest sports updates)

भारतीय संघाची फ्लॉप सुरुवात..

या सामन्यात भारतीय संघातील सलामी जोडी पूर्णपणे फ्लॉप ठरली. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली होती. सामन्यातील तिसऱ्याच चेंडूवर यान्सेनने जयस्वालला पॅव्हेलियनची वाट दाखवली. तर पुढच्याच षटकात शुभमन गिलही बाद होऊन माघारी परतला.

दक्षिण आफ्रिकेचा गेम प्लान....

पावसाने व्यत्यय आनल्यानंतर षटकं कमी करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १५ षटकात १५२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज कुठेही दबावात असल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात सोपा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT