आधी टाय, सुपर ओव्हर आणि मग पुन्हा एकदा सुपर ओव्हर. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात क्रिकेट चाहत्यांना ॲक्शन पॅक क्रिकेट पाहायला मिळालं आहे.
मालिकेतील तिसरा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने डबल सुपर ओव्हरमध्ये दमदार खेळ करत विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय संघाकडून सुपर ओव्हर टाकणाऱ्या रवी बिश्नोईने आपल्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे.
सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाचा विजय..
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित धर्माच्या शतकी खेळीच्या आणि रिंकू सिंगच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २१२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २१३ धावांची गरज होती. मात्र अफगाणिस्तानलाही २१२ धावा करता आल्या.
सुपर ओव्हर टाय..
सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. अफगाणिस्तानची सलामी जोडी मैदानावर उतरली. दोघांनी मिळून १७ धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करतानाही भारतीय संघाची धावसंख्या बरोबरीत सुटली. त्यानंतर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारतीय संघाने ११ धावा केल्या होत्या. तर धावांचा बचाव करण्यासाठी रवी बिष्णोई गोलंदाजीला आला होता. त्याने या धावांचा यशस्वीरीत्या बचाव केला आणि संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)
काय होता प्लान ?
अटीतटीच्या लढतीत ११ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी रोहितने रवी बिष्णोईकडे सोपवली. त्याने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडत केवळ १ धाव खर्च केली आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान सामन्यानंतरच्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, ' मला स्टंप लाईनवर गोलंदाजी करायची होती. मी अंतिम षटकात तेच केलं. माझा बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मी तेच केलं आणि मला यश मिळालं. '
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.