Jammu Drone Attack update  Saam tv
देश विदेश

Jammu Drone Attack : पाकड्यांचा भारतावर हल्ला; गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे ८ जवान जखमी, घटनास्थळी स्थिती काय?

Jammu Drone Attack update : पाकिस्तानने भारतावर शुक्रवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्याचे भारताचे ८ जवान जखमी झाले. या हल्ल्याने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पाकिस्तानचे भारतावर हल्ले सुरुच आहे. पाकिस्तानकडून जम्मूच्या आरएस पुरा भागात गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे ८ जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानने भारताच्या चौक्या आणि रहिवाशी विभागांना लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री गोळीबार केला.

पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ला आणि गोळीबार सुरु आहे. वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानी सैन्याकडून हल्ले सुरु आहेत. पाकिस्तानी सैन्याने सुरुवातीला सीमा भागात गोळीबार केला. आता त्यांनी रहिवाशी भागातही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून रहिवाशी भाग लक्ष्य केले जात आहेत. सेवानिवृत्त ब्रिगेडियर हरचरण सिंह यांनी म्हटलं की, युद्धाच्या पद्धतीत बदल झाला असून पाकिस्तान बिथरला आहे'.

सीमा सुरक्षा दलाचे जवान पाकिस्तानच्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे. सीमाभागात असलेल्या रहिवाशी भागांना लक्ष्य केले जात आहे. भारताचं नुकसान होण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्याकडून हल्ले केले जात आहे. भारतातील सीमालगतच्या रहिवाशी भागात हल्ले करून पाकिस्तान सक्षम असल्याचा दावा त्यांच्या नागरिकांपुढे करण्याची शक्यता आहे. कारगिल युद्धाचे नायक ब्रिगेडियर कुशाहल ठाकूर यांनी म्हटलं की, 'भारताने एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं होतं.

जम्मू शहराला याआधी कधीच लक्ष्य करण्यात आलं नव्हतं. पाकिस्तानी नागरिकांची शाबासकी मिळवण्यासाठी भारतातील रहिवाशी भागात हल्ले करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आम्हाला सीमेवर पाठवा; शेकडो तरुणांचं पंतप्रधान मोदींना पत्र

देशात सध्या भारत विरुद्ध पाकिस्तानात तणाव निर्माण झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत. एकीकडे पाकिस्तानचे सैन्य सीमेवरून पळून जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातील तरुण सीमेवर लढण्याची मागणी करत आहेत.

बारामती आणि इंदापूरमधील शिवधर्म फाउंडेशनच्या शेकडो युवकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. 'आम्हाला भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढण्याची परवानगी द्यावी आणि पाकड्यांच्या छातीत चार गोळ्या झाडण्याची संधी द्यावी,अशी मागणी करणारे पत्र शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT