lok sabha election Saam Tv
देश विदेश

Lok Sabha 2024: मिशन लोकसभा; नाराज नेत्यांवर भाजपच्या टीम-८ची नजर, काय आहे BJPचा नवा प्लान

lok sabha election 2024 : पक्ष संघटना मजबूत करण्यासह विरोधीपक्षात खिंडार पाडण्याची रणनीती भाजपने आखलीय. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते इतर पक्षातील नाराज नेत्यांवर नजर ठेवून असणार आहेत. भाजपने टीम-८ स्थापन केली असून ही टीम विरोधी पक्षांचे टेन्शन वाढवेल अशी शक्यता आहे.

Bharat Jadhav

Lok Sabha Election 2024 BJP Formed Team 8 :

लोकसभा २०२४ साठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. भाजप नेत्यांनी विविध राज्यात बैठकांचे सत्र चालू केलंय. पक्ष संघटना मजबूत करण्यासह विरोधीपक्षात खिंडार पाडण्याची रणनीती भाजपने आखलीय. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते इतर पक्षातील नाराज नेत्यांवर नजर ठेवून असणार आहेत. दुसऱ्या पक्षात नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचत त्यांना भाजपात समाविष्ट करण्याची योजना भाजपने आखलीय. (Latest News)

भाजपने (BJP) यासाठी टीम-८ स्थापन केली असून ही टीम विरोधीपक्षांचं टेन्शन वाढवेल असं म्हटलं जात आहे. भाजपने बनवलेली ही टीम सपा, बसपा, आरएलडी, जेडीयूसह इतर विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करेल. भाजपने तयार केलेल्या या टीममध्ये केंद्रीय भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव, केंद्रीय मंत्री मनसूख मंडवियाय आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनिल बन्सल यांचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा २०२४ मध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी भाजप तयारीला लागलाय. पक्ष मजबूत करण्यासह इतर पक्षातील नेत्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत एक समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीमध्ये केंद्रीय भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव, केंद्रीय मंत्री मनसूख मंडवियाय आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनिल बन्सल यांचा समावेश आहे. या समितीला टीम-८ नाव देण्यात आले आहे. ही टीम-८ इतर पक्षातील नाराज नेत्यांना भाजपात आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

गेल्या काही विधानसभासह मागील निवडणुकीत भाजपच्या ही रणनीती खूप यशस्वी राहिलीय. यामुळे केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजप ही रणनीतीवर काम करत आहे. इंडिया आघाडीमधील वाढता अंतर्गत कलह हा भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. वाढत्या कलहामुळे अनेक नेते इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात.

पुढील काही महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे पक्षातील नेते नाराज किंवा दुखी होऊ नये, याची काळजी भाजप ज्येष्ठ नेते घेत आहेत. स्थापन करण्यात आलेल्या टीमवर अशा नेत्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलीय. तसेच बाहेर येणाऱ्या नेत्यांना पक्षात घ्यायचं का नाही याची जबाबदारी या समितीची असेल. जर या समितीने त्या नेत्याला सहमती दर्शवली तर त्या नेत्याला पक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT