Uddhav Thackeray : Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांनी कोणाला फाशी दिली? उद्धव ठाकरेंचा सवाल, CM शिंदेंनी काय दावा केला होता? VIDEO

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. या घटनेच्या आडून कोणतही राजकारण होत नाही. घटनेआडून राजकारण होत असल्याचा विचार करणारे विकृत विचारणीचे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात कडेवर बसणाऱ्या मुलींवर अत्याचार होत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. अतसेच मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.

मुख्यमंत्री शिंदे यांनी एका जुन्या प्रकरणात दोन महिन्यात आरोपीला फाशी मिळवून दिल्याचा दावा केला होता. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून फाशी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले होते. त्यात उद्धव ठाकरेंचीही भर पडली आहे. 'मुख्यमंत्र्यांनी फाशीची शिक्षा दिली म्हणतात. मग आजवर अशा कोणत्या आरोपींना फाशी दिली गेली, याचे संशोधन करायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र बंदविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'बदलापूरला दुष्कृत्य घडलं, त्यावर २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुली शाळेत जात आहेत. तिथे मुली असुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली हे वाक्य कसं राहील? गेल्या काही दिवसांतील महिला अत्याचार बऱ्याच घटना झाल्या आहेत. या बातम्या नुसत्या पाहत कितपत जगायचे? कोलकातामधील घटनेनंतर देश खडबडून जागा झाला आहे. सहनशीलतेचा अंत होतो आणि लोकांचा उद्रेक होतो'.

'सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असली तर लाडकी बहीण योजना आणता येते. मुलींना मोफत शिक्षणाची सोय देखील केली आहे. कडेवर बसणाऱ्या मुलींवर अत्याचार होत आहे. त्यांच्यावरील अत्याचारानंतर प्रशासन ढिम्मपणे वागत असेल, तर काय करावं? हा बंद राजकीय पक्षांचा नाही. तर लोकांचा बंद आहे. उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा बंद आहे, असे ठाकरे पुढे म्हणाले.

'आगामी निवडणूक डोळ्यासमोर राबवलेली लाडकी बहीण योजना नव्हती. त्यांच्याजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यात घडलेली घटना मान्य आहे का, हे त्यांनी सांगावे. या घटनेमागे राजकारण वाटत असेल. त्यांची अक्कल दिवाळखोर आहे. हे दुष्यकृत्य आहे, असे त्यांना वाटत नसेल तर मुख्यमंत्री पण विकृत आहे. ते विकृत विचारणीचे आहेत. लोकांनी निषेध करायचा नाही का? अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती. एखाद्याची हत्या झाल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस हे कुत्र्यांशी तुलना करतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT