Narhari Zirwal interview Saam tv
मुंबई/पुणे

Narhari Zirwal interview : शरद पवारांवरील प्रेम, मंत्रालयातील जाळीवर उडी, संतोष देशमुख प्रकरण; नरहरी झिरवाळ यांची सनसनाटी मुलाखत,VIDEO

Narhari Zirwal interview in marathi : नरहरी झिरवाळ यांनी साम टीव्हीला सनसनाटी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांवरील प्रेम, मंत्रालयातील जाळीवर उडी, संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं.

Vishal Gangurde

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा बाजी मारली. सरपंच ते मंत्री असा नरहरी झिरवाळ यांचा प्रवास राहिला आहे. झिरवाळ यांनी ग्रामीण भागातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. महायुतीच्या सरकारमध्ये नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य हे खाते मिळालंय. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या खात्याच्या कामालाही सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यात अनेक महत्वाचे निर्णयही त्यांनी घेतले. याच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी साम टीव्हीला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत शरद पवारांवरील प्रेम, मंत्रालयातील जाळीवर उडी, संतोष देशमुख प्रकरणावर मोठं भाष्य केलं.

साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमाच्या मुलाखतीत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. विधानसभा उपाध्यक्षावर असता कोणता दबाव होता का, यावर भाष्य करताना नरहळी झिरवाळ म्हणाले, ' विधानसभा उपाध्यक्ष पदावर असताना निर्णय देताना निष्पक्षपातीपणे निर्णय द्यावा लागतो. त्यामुळे उशीर झाला. निर्णय देताना कोणाचा दबाव नव्हता. तो माझा आणि तो परका, असा निर्णय देता येत नाही. अशी आपण गीतेची शपथ घेतलेली असते. निर्णय द्यायला विलंब झाला. कोर्टात प्रकरण गेलं. नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे'.

विधानसभा निडणुकीत उमेदवारी मिळताना अडचण काय झाली, यावर बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, 'माझ्या ४ टर्म झाल्या. पहिल्यावेळी काही वाटत नाही. दुसऱ्याला थोडी अडचण येते. तिसऱ्यावेळी आणखी अडचण येते. चौथ्यावेळी आणखी अडचण वाढते. माझी आताची चौथी टर्म होती. त्यामुळे मला आत्मविश्वास होता. मला उमेदवारी मिळणार असल्याची खात्री होती'.

महायुतीत मिळालेल्या मंत्रिपदावर झिरवाळ काय म्हणाले?

मंत्री झिरवाळ म्हणाले, ' माझी खंत नव्हती. माझी हिंगोलीची पालकमंत्री म्हणून निवड झाली. तिथे महायुतीचे ३ आमदार आहेत. त्यांनी तिघांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. आमचा तालुका औद्योगिक क्षेत्रात मागे आहे. पाण्यात सिंचनासाठी मागे आहे. भरभक्कम विकास झालेला नाही. तुमच्या सारखा दादांचा विश्वास असणारा, आम्हाला भरीव निधी मिळेल. एमआयडीसी आणता येईल. विजेचे प्रश्न असतील. छोट्या बंधाऱ्यांना तिथे अडचणी आहेत. छोटे सिमेंट बंधारे मोठ्या प्रमाणात करता येतील. आज तिथे स्मशानभूमी देखील नाहीत. ती खंत व्यक्त केली'.

'अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य हे कोणी खातं दिलं, असं सुरुवातीला वाटत होतं. खरंतर अन्न, औषध, प्रशासन आणि विशेष सहाय्य हे तिन्ही खाते सर्वसामान्य लोकांच्या गरजेची आहेत. गरीब आणि श्रीमंत व्यक्ती असला तरी सर्वांना अन्न आणि औषधाची गरज असते. अन्न चांगलं असावं. बाळ पोटात असताना त्या दिवसापासून अन्नाची गरज असते. तर शेवटच्या दिवसापर्यंत औषधाची गरज असते. लहान बालकांना दूधाआधी औषध पाजलं जातं'.

दूधातील भेसळीवरही झिरवाळ यांनी भाष्य केलं. 'मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आढावा बैठक घेतली. मागे किती काम कशा पद्धतीने झालं, याविषयी बैठक झाली. पूर्वी जाड असेल, त्याला हार्टअॅटक येतो. असं वाटायचं. मात्र आता कोणालाही हार्टअॅटक येतो. त्यामुळे लोकांना अन्नात भेसळ होते, असे वाटतं. ही चर्चा दूधात महत्वाची आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दूधाचं सेवन करत असतो. कोणालाही न सांगता नमुने घेऊन चाचणी करण्याचा निर्णय झाला. सकाळी ८ वाजल्यापासून १०६८ नमुने घेतले. ते तपासले. त्यावेळी १३३ नमुने भाजी आढळले. सोडियम क्लोराइड अधिक प्रमाणात आढळले.

'दूधात मीठ टाकलं तर दूध खराब होतं किंवा फुटतं. त्यात सोडियम क्लोराइड टाकलं जातं. याबाबत तज्ञ्जांना विचारलं. दुसऱ्या बाजूने इतर केमिकल टाकलं तर चांगलं दूध तयार होतं. तज्त्रांना विचारलं, खराब दूध चांगलं होतं. आता काही नमुने घेतले आहेत. यात आता कायदेशीर कारवाई करणार आहे.डेरी, टँकर, सुटे दूध अशा सर्व प्रकारचे नमुने घेतले आहेत, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

शरद पवारांशी संपर्क झाला का, यावर बोलताना झिरवाळ म्हणाले, आजही शरद पवारांवरही प्रेम आहे. साहेब साहेब आहे. आता फक्त भेट झालेली नाही. तसेच कोणतंही बोलणं झालेलं नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT