मुंबईमध्ये आपले हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पू्र्ण होणार आहे. कारण त्यांना आता कमी किंमतीमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये म्हाडाचे घर खरेदी करता येणार आहे. म्हाडाने घरांच्या किंमती कमी झाल्या आहेत. म्हाडाने नुकताच काढलेल्या लॉटरीमध्ये घराच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे अर्ज कमी आले होते. त्यानंतर १० ते २५ टक्क्यांनी घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही महत्वाची माहिती दिली. तसंच अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ देखील देण्यात आली आहे.
म्हाडाकडून २,०३० घरांसाठीची लॉटरी काढण्यात आली आहे. यामधील ३७० घरं ही म्हाडाला विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकासकांकडून मिळाली आहेत. ही घरं मुंबईमधील ताडदेव, जुहू, विक्रोळी, माजगाव, कुर्ला, डी.एन नगर आणि बोरिवली भागांमध्ये आहेत. पण या घरांच्या किंमती जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे या घरांसाठी कमी अर्ज आले आहेत. म्हाडाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून फक्त ३०,००० अर्ज आले आहेत. या घरांसाठी मिळणारा प्रतिसाद कमी असल्याचे लक्षात घेता म्हाडाकडून घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरांच्या किमती १० टक्के ते २५ टक्के इतक्या कमी होणार आहे. मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या या लॉटरीसोबतच भविष्यात येणाऱ्या लॉटरींसाठी देखील हा निर्णय कायम राहणार असल्याचे अतुल सावे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. म्हाडाकडून आता घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत आणि अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिल्यामुळे आता जास्तीत जास्त अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- अल्प गटासाठी घरांची मूळ किंमत ६२ लाख रुपये होती. आता ही घरं ५० लाखांत मिळणार आहेत.
- अत्यल्प गटासाठी घरांची मूळ किंमत ३८ लाख रूपये होती. आता ही घरं २२ लाखांत मिळणार आहेत.
- अत्यल्प गटासाठी घराची मूळ किंमत ४२ लाख रुपये होती. आता ही घरं फक्त ३२ लाखांमध्ये मिळणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.